पर्यावरण जीवनवादाशी जोडल्यास मानवी जीवन सुसह्य: अतुल देऊळगावकर कोल्हापूर (प्रतिनिधी): देशातील सध्याच्या विकास सर्वभक्षी बाजार संस्कृतीचे लक्षण असल्याने विकासाच्या संकल्पनांची पुनर्मांडणी होणे आवश्यक आहे. यासाठी पर्यावरणाचा प्रश्न जीवनवादाशी जोडला गेला तरच मानवी जीवन सुसह्य होईल, असे मत ख्यातनाम पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाचा पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन, हिंदी अधिविभाग, किर्लोस्कर ऑईल इंजिन आणि …