Home पर्यावरण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा कोल्हापूर तर्फे वृक्षारोपण व स्वच्छता अभियान उत्साहात

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा कोल्हापूर तर्फे वृक्षारोपण व स्वच्छता अभियान उत्साहात

0 second read
0
0
11

no images were found

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा कोल्हापूर तर्फे
वृक्षारोपण व स्वच्छता अभियान उत्साहात

कोल्हापूर,: देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहना नुसार ‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत तसेच ‘एक कदम स्वच्छता की ओर’ या संकल्पनेतून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्यावतीने वृक्षारोपण व स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. रंकाळा परिसरातील राजकपूर पुतळ्यासमोरील छत्रपती शाहू उद्यान येथे वृक्षारोपण करून या अभियानास प्रारंभ करण्यात आला यावेळी ५० वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शाहू उद्यान, तांबट कमान, संध्यामठ परिसर तसेच रंकाळा टॉवर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. परिसरातील कचरा संकलित करून नागरिकांमध्ये स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमात भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. उद्यानात नियमित फिरण्यासाठी येणाऱ्या अनेक नागरिकांनीही स्वच्छता मोहिमेत सहभागी होत उपक्रमाचे स्वागत केले. याप्रसंगी महानगरपालिका आरोग्य विभागाचे कर्मचारीही उपस्थित होते.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्रजी मोदी स्वतः झाडू हाती घेऊन स्वच्छतेचा संदेश देत आहेत. स्वच्छता, वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या लोकोपयोगी उपक्रमांना देशभरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. ‘आपला देश, आपली जबाबदारी’ या भावनेतून नागरिक मोदीजींच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. वाढते तापमान, प्लास्टिकचा वाढता वापर आणि पर्यावरणीय असमतोल ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा तसेच स्वच्छ व सुंदर परिसर निर्मितीसाठी सक्रिय योगदान द्यावे.”
हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विराज चिखलीकर, राजेश कोगनुळकर, अमर साठे, हेमंत आराध्ये यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, हेमंत आराध्ये, विराज चिखलीकर, विशाल शिराळे, आप्पा लाड, राजेश कोगनुळकर, नगरसेवक विजय उर्फ रिंकू देसाई, बबन मोकाशी, अजित ठाणेकर, अर्चना कोराणे, ॲड. पूर्वा राणे, दीपा ठाणेकर, निलांबरी साळोखे, माधुरी नकाते, कोमल देसाई, प्रकाश सरनाईक, प्राची कुलकर्णी, रश्मी साळोखे, किरण नकाते, सुधीर देसाई, संग्रामसिंह जरग, महेश यादव, भरत काळे, दिलीप मैत्राणी, सयाजी आळवेकर, प्रशांत मोरे, अनिल कामत, गिरीश साळोखे, मनोज कदम, सुहास सदलगे, दिग्विजय कालेकर, सुधीर बोळावे, विश्वजीत पवार, विनय खोपडे, विवेक कोरडे, अनिल कोळेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In पर्यावरण
Comments are closed.

Check Also

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आप’तर्फे रक्तदान शिबिर

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आप’तर्फे रक्तदान शिबिर कोल्हापूर (प्रतिनिधी):शिवरा…