शहरामध्ये 13 जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा कोल्हापूर, : अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सून लांबल्याने काळम्मावाडी धरणातील पाणीपातळी कमी झाली आहे. तसेच काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन योजनेद्वारे होणारा पाणी उपसा बंद झाल्याने या योजनेतून शहराला पाणीपुरवठा करणे सध्या शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी येथील पंपिंग स्टेशनमधून पाणी उपसा सुरू करण्यात आला आहे. आगामी पावसाची …