गोवंडी सुधारगृहातून ६ अल्पवयीन मुली गेल्या पळून, काही तासांत दोघी परतल्या मुंबई : मुंबईतील गोवंडी भागातील सुधारगृहातून सहा अल्पवयीन मुली पळून गेल्या होत्या. मात्र, त्यातील दोघी काही तासांनंतर स्वेच्छेने परतल्या. एका पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी यासंदर्भात माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे सायन-ट्रॉम्बे रोडवरील सुधारगृहातून सुमारे १५-१७ वयोगटातील सहा मुलींनी खिडकीचे ग्रील दगडाने फोडून पळ काढला होता. तपासादरम्यान समोर आलेल्या …