सर्वसामान्यांसाठी विरोधकांनी सरकारला सहकार्य करावे-हेमंत पाटील मुंबई, राज्यात सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात अनेक महत्वाचे प्रश्न विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांनी उपस्थित केले आहेत.अशात केवळ विरोधकांनी विरोधासाठी विरोध करून चालणार नाही.राज्यातील समस्या फक्त विधायक मार्गानेच सोडवता येवू शकतात.अशात विरोधकांनी विधिमंडळातील गदारोळ थांबवून चर्चेला समोर जाण्याचे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सोमवारी केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह राज्यातील बेरोजगारी तसेच …