Home राजकीय आठवडयातील सातही दिवस कोल्हापूर-मुंबई मार्गावर स्लिपर वंदे भारत रेल्वे सुरू करावी, तर सहयाद्री एक्सप्रेस पूर्ववत मुंबई पर्यंत धावावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसद अधिवेशनात मागणी

आठवडयातील सातही दिवस कोल्हापूर-मुंबई मार्गावर स्लिपर वंदे भारत रेल्वे सुरू करावी, तर सहयाद्री एक्सप्रेस पूर्ववत मुंबई पर्यंत धावावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसद अधिवेशनात मागणी

7 second read
0
0
8

no images were found

आठवडयातील सातही दिवस कोल्हापूर-मुंबई मार्गावर स्लिपर वंदे भारत रेल्वे सुरू करावी, तर सहयाद्री एक्सप्रेस पूर्ववत मुंबई पर्यंत धावावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसद अधिवेशनात मागणी

नवी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात आज खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरच्या एका जिव्हाळयाच्या प्रश्‍नाबाबत लेखी मुद्दा उपस्थित केला. कोल्हापूर ते पुणे या मार्गावर आठवडयातील तीन दिवस सकाळी सुरू असलेली वंदे भारत एक्सप्रेस, आठवडयातील सातही दिवस मुंबईपर्यंत न्यावी. तसेच रात्री कोल्हापुरातून वंदे भारत एक्सप्रेस सुटावी आणि सकाळी लवकर मुंबईत पोचावी, अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर कोव्हीड काळापासून बंद झालेली कोल्हापूर-मुंबई सहयाद्री एक्सप्रेस सध्या केवळ पुण्यापर्यंत जाते. ही रेल्वे सुध्दा पूर्ववत मुंबईपर्यंत सोडावी, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली आहे.
संसदेच्या अधिवेशनात आज खासदार महाडिक यांनी एका लेखी प्रश्‍नाद्वारे कोल्हापूरच्या एका महत्वाच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले. सध्या आठवडयातून तीन दिवस सकाळच्या सत्रात कोल्हापूर-पुणे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावते. एकिकडे कोल्हापूर ते मुुंबई या मार्गावर महालक्ष्मी एक्सप्रेस एकच रेल्वे गाडी सुरू असून, मुंबईसाठी आणखी एक रेल्वे गाडीची नितांत आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर स्लिपर कोच असलेली वंदे भारत एक्सप्रेस दैनंदिन स्वरूपात सुरू व्हावी, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. कोल्हापूर ते मुंबई मार्गावरील रेल्वे गाडयांना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतो. तरीही कोव्हिड काळापासून कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर धावणारी सहयाद्री एक्सप्रेस सध्या केवळ पुण्यापर्यंतच जाते. नव्या रेल्वे गाडयांची आवश्यकता असताना, जुन्या रेल्वे एक्सप्रेस मर्यादित करू नयेत, तसेच रोज वंदे भारत एक्सप्रेस सुरू व्हावी, जेणेकरून कोल्हापूरच्या उद्योग, पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असे खासदार महाडिक यांनी दिलेल्या पत्रात नमुद केले आहे. जनभावनेचा सन्मान करून रेल्वे मंत्रालय या मागण्यांची पूर्तता करेल, असा विश्‍वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

हाराच्या सवयी आणि ताणतणाव वाढवणाऱ्या इच्छांवर नियंत्रण ठेवा – डॉ. करानी बी. संजीवी

आहाराच्या सवयी आणि ताणतणाव वाढवणाऱ्या इच्छांवर नियंत्रण ठेवा – डॉ. करानी बी. संजीवी …