Home उद्योग व्यवसायाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उद्योग-शिक्षण या क्षेत्रांचा सुसंवाद आवश्यक :भारत वसवाल ओसवाल 

व्यवसायाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उद्योग-शिक्षण या क्षेत्रांचा सुसंवाद आवश्यक :भारत वसवाल ओसवाल 

11 second read
0
0
18

no images were found

व्यवसायाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उद्योग-शिक्षण या क्षेत्रांचा सुसंवाद आवश्यक :भारत वसवाल ओसवाल 

कोल्हापूर (प्रतिनिधी):- व्यवसायाच्या अपेक्षा पूर्ण करणारी युवा पिढी निर्माण करण्यासाठी उद्योग-शिक्षण या क्षेत्रांचा सुसंवाद आवश्यक आहे असे प्रतिपादन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष भारत वसवाल ओसवाल यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाच्यावतीने पीएम-उषा योजनेअंतर्गत आयोजित केलेल्या उद्योग विद्यापीठ सुसंवाद कार्यक्रमांमध्ये उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विभागप्रमुख प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन होते. 

महेंद्र ज्वेलर्सचा उद्योजकीय प्रवास उलगडताना त्यांनी विद्यार्थ्यांना काही महत्वाच्या टिप्स दिल्या “कष्ट व काम करण्याची तयारी ठेवल्यास पैसा आपोआप येईल. सुवर्णालंकार व्यवसायातील नवोपक्रम अंगीकारल्यामुळे व्यवसायाचा विकास होत गेला ध्येय निश्चित करून त्यावर काम करा प्रामाणिकपणावर स्पर्धेत टिकून राहता येते. प्रतिभा गुण आणि मेहनत यावर युवकांना संधी आहे. समस्या सोडवणुकीचे, टीम-वर्कचे, वेळेच्या शिस्तीचे कौशल्य प्राप्त करा, तरच आपल्याला टिकता येईल असे आवाहन श्री. ओसवाल यांनी केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. महाजन म्हणाले की, शिक्षण क्षेत्राचा उद्योग-व्यवसायाशी संवाद अत्यंत आवश्यक असून अभ्यासक्रम, संशोधन, आंतरवासिता आणि कर्मचारी नियुक्ती या विविध गोष्टींसाठी दोन्ही क्षेत्रांना तो लाभदायक आहे. 

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. केदार मारुलकर यांनी केले. तर डॉ. तेजपाल मोहरेकर यांनी आभार मानले. 

दुसऱ्या सत्रात समर्थ ग्रुप ऑफ कॅम्पनीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय कारखानीस यांनी संवाद साधला. ते म्हणाले कि, “जीवनामध्ये ३ एफ हे पर्याय असतात. तो निवडण्यासाठी व्यवसायातील प्रत्यक्ष ज्ञान, कौशल्ये, प्रज्ञा व आणि वृत्ती यांचा अंगीकार करा आणि तंत्रज्ञानातील बदल आत्मसात करा. ज्ञान असण्याच्या नोकऱ्या संपणार आहेत पण ज्ञानाचे उपयोजन असणाऱ्या नोकऱ्या असणारच आहेत. त्यासाठी तुम्ही तयार राहिले पाहिजे.” दैनिक लघु सुधारणा, पी डी सी सायकल, पेस्टल कॉनतेक्स्त या संकल्पनेचा वापर प्रभावी ठरल्याचे त्यांनी सांगितले.  

तिसऱ्या सत्रात Adapt Consultant चे श्री. अमित माटे यांनी विद्यार्थ्यांना व्यवसाय उभारणीसाठी मार्गदर्शन केले तसेच व्यवस्थापन सल्लागार या व्यवसायाची माहिती दिली. 

चौथ्या सत्रात पॅनेल चर्चेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये चार्टर्ड अकौंटट गिरीश सामंत, व्यवस्थापन सल्लागार डॉ. महादेव शिंदे, माजी विद्यार्थी प्रा. डॉ. अनिल सूर्यवंशी, उद्योग-विद्यापीठ सुसंवाद कक्षाचे समन्वयक डॉ. सागर डेळेकर यांनी भाग घेतला. सदर सत्राची अध्यक्षता प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केली. या सत्राचे प्रास्ताविक डॉ. केदार मारुलकर यांनी केले. तर डॉ. तेजपाल मोहरेकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री. युवराज टिपुगडे, श्रीमती मंजिरी कांबळे, श्री. प्रेषित कांबळे, श्रीमती धनेश्वरी शिंदे, श्री. हरीश कांबळे, श्री. भरत रावण, श्री. सुरज, श्री. तुषार  पाटील आणि श्री सामी मुल्ला यांनी परिश्रम घेतले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…