no images were found
अमरावतीच्या कामगारांचा मध्य प्रदेशात भीषण अपघातात ११ जण ठार
भोपाळ : मध्य प्रदेशात बसने कारला दिलेल्या धडकेत ११ जण ठार झाले आहेत. गुरुवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व ११ कामगार महाराष्ट्रातील अमरावतीचे होते. मध्य प्रदेशातील बैतुल येथे रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला आहे.
बैतुल जिल्ह्यात परिसरात बस आणि कारची समोरासमोर धडक बसली. यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातात मृत्यू झालेल्या कामगार हे महाराष्ट्रातील अमरावती येथे निघाले होते. रात्री (पाहाटे)२ वाजता बसने त्यांच्या एसयुव्हीला धडक दिली. मात्र, ही धडक इतकी जोरत होती की कारचा चेंदामेंदा झाला आहे. पोलिसांना कारचा पत्रा कापून काही मृतदेह बाहेर काढावे लागले आहेत. एसयुव्ही बसच्या आतमध्ये घुसली असल्याने इतर मृतदेह काढण्यासाठी तिचा पत्रा कापावा लागला अशी माहिती बेतुलचे पोलीस अधिक्षक सिमला प्रसाद यांनी दिली आहे.