Home उद्योग सिनेमा हा राष्ट्रनिर्मितीचा आत्मा आहे; गौतम अदाणी

सिनेमा हा राष्ट्रनिर्मितीचा आत्मा आहे; गौतम अदाणी

38 second read
0
0
60

no images were found

सिनेमा हा राष्ट्रनिर्मितीचा आत्मा आहे; गौतम अदाणी

अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी यावेळी कोणत्याही बिझनेस इन्स्टिट्यूट किंवा समिटमध्ये नव्हते, तर ते सिनेमा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मधोमध होते. सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांनी स्थापन केलेल्या व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल येथे अदाणी यांनी सिनेमा विभागातील विद्यार्थ्यांना संबोधित केले.त्यांनी विद्यार्थ्यांना आणि उद्योग क्षेत्रातील पाहुण्यांना सांगितले की सिनेमा हा राष्ट्रनिर्मितीचा आत्मा आहे, तसेच चेतावणी दिली की कथा – मग त्या कला, माध्यम किंवा बाजारात असोत – त्या नशिब ठरविण्याची शक्ती ठेवतात.

सिनेमा या ‘सॉफ्ट पॉवरचे महत्त्व

आपल्या मुख्य भाषणात, ज्याचे शीर्षक होते “जिना यहाँ, मरना यहाँ: राष्ट्रनिर्मितीची सिनेमाई आत्मा, अदाणी म्हणाले की सिनेमा म्हणजे चालती-बोलती कविता आणि रंगांचा सुरेख संगम आहे. त्यांनी सिनेमा हे समाजाच्या सामूहिक चेतनेचे प्रतीक, संस्कृतींमध्ये पूल बांधणारे माध्यम आणि सरकारांपेक्षा जास्त काळ टिकणारी सॉफ्ट पॉवर असल्याचे सांगितले.

व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल, मुंबई फिल्म सिटीतील 20 एकराच्या कॅम्पसमध्ये, 2006 मध्ये सुभाष घई यांनी स्थापन केले. हे भारतातील प्रमुख फिल्म, संप्रेषण आणि क्रिएटिव्ह आर्ट्स संस्थांपैकी एक आहे, ज्यात फिल्ममेकिंग, अभिनय, अॅनिमेशन, फॅशन, संगीत आणि मीडिया मॅनेजमेंटचे कोर्सेस दिले जातात. या संस्थेला सतत जगातील सर्वोत्तम फिल्म स्कूल्समध्ये स्थान मिळाले आहे.

गुरुदत्त आणि राज कपूर यांना श्रद्धांजली

        गुरुदत्त आणि राज कपूर यांच्या शताब्दी वर्षानिमित्त अदाणी यांनी श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले की त्यांचे कार्य सिनेमा या माध्यमाच्या परिवर्तनशील शक्तीचे प्रतीक आहे.ते म्हणाले,“राज कपूर यांच्या ‘अनाडी’तील गाणी ही फक्त कला नाहीत, ती तत्त्वज्ञान आहेत. त्यांनी जगाला खऱ्या भारताचे दर्शन घडवले.”अदाणी यांनी सांगितले की सोव्हिएत युनियनमध्ये राज कपूर यांच्या लोकप्रियतेमुळे अशा काळात देशांमधील संबंध मजबूत झाले जेव्हा राजकीय आघाड्या कमकुवत होत्या.

स्वतःच्या जीवनप्रवासाची आठवण

        भाषणादरम्यान अदाणी यांनी सिनेमा आपल्या जीवनाशी जोडत आठवण सांगितली. ते म्हणाले, “मी १६ व्या वर्षी रिकाम्या खिशाने मुंबईत आलो, पण माझ्या डोळ्यांत स्वप्नांचे आकाश होते. ३० व्या वर्षी मी भारतातील सर्वात मोठे औद्योगिक घराणे उभे केले, ३२ व्या वर्षी ते सार्वजनिक केले आणि ३४ व्या वर्षी बंदरे व वीज क्षेत्रात प्रवेश केला.ज्या नायकांना पडद्यावर पाहिले, त्यांना मी आयुष्यात जगलो.”

        खोट्या कथां’विषयी चेतावणी

        अदाणी यांनी पुढे सांगितले की आजच्या परस्पर-जोडलेल्या जगात कथा फक्त संस्कृती नव्हे तर अर्थव्यवस्था आणि बाजारपेठांनाही आकार देतात. त्यांनी अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडनबर्ग रिसर्चच्या जानेवारी २०२३ मधील अहवालाचे उदाहरण दिले.ते म्हणाले, “ही एक खोटी पटकथा होती जी जगभर पसरवली गेली. काही दिवसांतच १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त बाजारमूल्य नाहीसे झाले—कारण तथ्य बदलले नव्हते, धारणा बदलल्या होत्या.”ते पुढे म्हणाले, “मौन राहिल्याने इतरांना तुमचे भविष्य लिहिण्याची संधी मिळते. सत्याला जोराने सांगितले पाहिजे – प्रचार म्हणून नाही, तर वास्तव म्हणून.”अदाणी म्हणाले की हिंडनबर्ग प्रकरण ही फक्त एका कंपनीची कथा नव्हे, तर एक केस स्टडी आहे की चुकीची माहिती आणि बनावट कथा बाजार व अर्थव्यवस्था कशा अस्थिर करू शकतात.ते म्हणाले, “जसे सिनेमा राष्ट्रांची कथा सांगतो, तसेच बाजारही कथांवर चालतात. प्रश्न हा आहे – या कथा कोण आणि कोणत्या हेतूने लिहिते?”*

        सिनेमा आणि भविष्य – एआयची झलक

अदाणी यांनी पुढे सांगितले की कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) फिल्मनिर्मितीत क्रांती घडवेल.ते म्हणाले,“आगामी दशकात निर्मितीचा खर्च ८०% पर्यंत कमी होऊ शकतो.”त्यांनी कल्पना मांडली की एआयच्या मदतीने एका दिवसात जागतिक रिलीज होतील, गाणी व संवाद क्षणात अनेक भाषांमध्ये तयार होतील, कथानक रिअल टाइममध्ये बदलतील, प्रत्येक प्रेक्षकाला वेगळे संस्करण दिसेल, आणि डिजिटल कलाकार पिढ्यान्‌पिढ्या जिवंत राहतील.त्यांनी एआय स्टुडिओजचीही कल्पना केली – जिथे माणूस आणि मशीन एकत्र काम करतील आणि सिनेमा स्वतः एक व्यवसाय बनून जाईल. म्हणजे पडद्यावर दिसणारी प्रत्येक गोष्ट तत्काळ खरेदीसाठी उपलब्ध असेल.

    भारतीय कथा भारतीय दृष्टीकोनातून सांगण्याचे आवाहन

अदाणी यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की भारतीय कथा परदेशी नजरेतून सादर करू नयेत.स्लमडॉग मिलियनेअरचा दाखला देत त्यांनी सांगितले की या चित्रपटाने गरीबीला तमाशा बनवले.ते म्हणाले,“आता कधीही कोणत्याही भारतीय महात्म्याची कथा परदेशी दृष्टिकोनातून लिहिली जाऊ नये. भारताला त्याचा आवाज, त्याची गाणी, त्याच्या कथा परत द्या.”

       कार्यक्रमातील उपस्थिती

या कार्यक्रमाला उद्योगजगत, शिक्षणक्षेत्र आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक नामांकित व्यक्ती उपस्थित होत्या, ज्यात सुभाष घई, फॅकल्टी सदस्य आणि मीडिया-मनोरंजन उद्योगातील प्रमुख हस्तींचा समावेश होता. सर्वांनी एकत्रितपणे गौतम अदाणींचे उत्साहाने स्वागत केले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…