
no images were found
अदानी एअरपोर्ट्सकडून पुढील टप्प्याच्या वाढीसाठी 750 दशलक्ष डॉलर्सचा जागतिक वित्तपुरवठा सुनिश्चित
* आंतरराष्ट्रीय बँकांद्वारे ईसीबी (एक्सटर्नल कमर्शियल बोरोविंग्स ) च्या माध्यमातून 750 दशलक्ष डॉलर्सचा वित्तपुरवठा निश्चित केला
* या निधीचा वापर विद्यमान 400 दशलक्ष डॉलर्स कर्जाच्या पुनर्वित्तासाठी तसेच सहा एअरपोर्ट्स आणि एएएचएलच्या नॉन-एरो व्यवसायाच्या वाढीसाठी केला जाणार
* या वित्तपुरवठ्याचं नेतृत्व फर्स्ट अबू धाबी बँक, बार्कलेज पीएलसी आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँक यांनी केलं
अहमदाबाद, – भारतातील सर्वात मोठा खासगी विमानतळ संचालक (एअरपोर्ट ऑपरेटर) आणि अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचा उपघटक असलेल्या अदानी एअरपोर्ट्स होल्डिंग्स लिमिटेड (एएएचएल) ने आंतरराष्ट्रीय बँकांच्या गटाकडून एक्सटर्नल कमर्शियल बोरोविंग्स (ईसीबी) च्या माध्यमातून 750 दशलक्ष डॉलर्स उभारले आहेत. या व्यवहाराचे नेतृत्व फर्स्ट अबू धाबी बँक, बार्कलेज पीएलसी आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँक यांनी केले.
या निधीचा वापर विद्यमान कर्जाच्या पुनर्वित्तासाठी, पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी आणि सहा विमानतळांच्या (अहमदाबाद, लखनऊ, मंगलुरू, जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम) क्षमतेच्या वाढीसाठी केला जाणार आहे. तसेच, संपूर्ण विमानतळ नेटवर्कवर नॉन-एरोनॉटिकल व्यवसाय जसे की रिटेल, एफ अँड बी (फूड अँड बेव्हरेज), ड्युटी फ्री आणि इतर सेवा यांचा विस्तारही यातून करण्यात येईल.
एएएचएल ने वित्तीय वर्ष 2024–25 मध्ये 94 दशलक्ष प्रवाशांची सेवा केली असून सध्या त्यांची एकूण क्षमता 110 दशलक्ष प्रवाशी इतकी आहे. 2040 पर्यंत ही क्षमता टप्प्याटप्प्याने वाढवून 300 दशलक्ष प्रवाशी प्रतिवर्ष करण्याचं उद्दिष्ट आहे. या योजनेचा भाग म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच कार्यान्वित होणार असून, पहिला टप्पा 20 दशलक्ष प्रवाशांच्या क्षमतेसह सुरु होईल आणि पुढील टप्प्यांमध्ये ती क्षमता वाढवून 90 दशलक्षपर्यंत नेण्यात येईल, ज्यामुळे मुंबई परिसरातील विमान सेवा पायाभूत सुविधा लक्षणीयरित्या वाढणार आहेत.
एएएचएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बंसल म्हणाले, “जागतिक वित्तीय संस्थांनी दाखवलेला विश्वास हे भारताच्या विमानतळ पायाभूत सुविधांच्या दीर्घकालीन मूल्य आणि क्षमतेचं प्रतीक आहे. एएएचएलने आपल्या संपूर्ण विमानतळ नेटवर्कवर टेक्नॉलॉजीचा वापर करत ग्राहकांना अनन्यसाधारण अनुभव देण्यासाठी शाश्वततेला आणि स्थानिक समाजाशी जुळवून घेण्याला प्राधान्य देत आपली वाटचाल करत आहे. आमचा प्रवास सुरूच आहे आणि ‘गेटवे टू गुडनेस’ म्हणून आम्ही ग्राहककेंद्रित उपाय देण्यास आणि सेवा व शाश्वततेमध्ये जागतिक स्तरावर उदाहरण ठरतील अशा दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यास कटिबद्ध आहोत.”
या व्यवहारासाठी इंग्लिश लॉ कॉंसिल(कायदेशीर सल्लागार) म्हणून लॅथम अँड वॉटकिंस एलएलपी आणि लिंकलेटर्स एलएलपी यांनी काम केलं, तर इंडियन लॉ कॉन्सिल म्हणून सिरील अमरचंद मंगलदास आणि टीटी अँड ए कार्यरत होते.