Home बँकिंग एचडीएफसी  बँक ‘परिवर्तन’च्या ग्रामीण विकास उपक्रमांतर्गत 298 सीमावर्ती गावांना सामावून घेतले 

एचडीएफसी  बँक ‘परिवर्तन’च्या ग्रामीण विकास उपक्रमांतर्गत 298 सीमावर्ती गावांना सामावून घेतले 

22 second read
0
0
22

no images were found

एचडीएफसी  बँक ‘परिवर्तन’च्या ग्रामीण विकास उपक्रमांतर्गत 298 सीमावर्ती गावांना सामावून घेतले 

मुंबई, : एचडीएफसी बँक या भारतातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँकेने आपल्या सीएसआर  शाखा ‘परिवर्तन’ अंतर्गत ग्रामीण विकास उपक्रमांतर्गत देशभरातील 298 सीमावर्ती गावांना सामावून घेतले आहे. हे गावांचे समूह आसाम, अरुणाचल प्रदेश, बिहार, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, राजस्थान, सिक्कीम, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांच्या सीमावर्ती भागात वसलेली आहेत. येत्या काही वर्षांत अशा आणखी 150 सीमावर्ती गावांपर्यंत आपली पोहोच वाढविण्याची बँकेची योजना आहे. हे उपक्रम सीमा क्षेत्र विकास कार्यक्रम आणि व्हायब्रंट व्हिलेजिस प्रोग्राममध्ये नमूद केलेल्या राष्ट्रीय विकास ध्येयांशी सुसंगत आहेत.

       हिमालयाच्या उत्तर आणि ईशान्य दिशेकडील आणि देशाच्या पश्चिमेस वाळवंटी प्रांतांच्या सीमेवर वसलेल्या गावांना बऱ्याचदा खडतर भूभाग, आवश्यक सेवांपर्यंत मर्यादित पोहोच आणि त्यांच्या दुर्गम जागांमुळे आर्थिक असुरक्षितता यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या प्रदेशात गरजेनुसार कार्य करून ‘परिवर्तन’ने येथील सुमारे पाच लाख लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम केला आहे.या क्षेत्रात बँकेने दोन मुख्य प्रकारचे प्रकल्प लागू केले आहेत:

    1) सर्वांगीण ग्रामीण विकास कार्यक्रम : याच्या अंतर्गत 36-48 महिन्यांच्या कालावधीत 15-20 जवळपासच्या गावांच्या समूहावर लक्ष केंद्रित करण्यात येते. यात ग्रामीण विकास, शिक्षण, कौशल्य विकास, आर्थिक समावेशकता, आरोग्य आणि स्वच्छता आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन सारख्या विविध पैलूंचा समावेश आहे.

2) फोकस्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम  : हा उपक्रम हस्तक्षेपाच्या विशिष्ट क्षेत्रांना लक्ष्य बनवतो, ज्यामुळे एका क्षेत्रात सकेंद्रित परिणाम दिसतो.

       एचडीएफसी बँकेचा परिवर्तन उपक्रम विविध सीमावर्ती प्रदेशात राहणाऱ्या ग्रामीण समुदायांना सक्षम बनविण्याबाबत वचनबद्ध आहे, प्रस्तुत उपक्रमाविषयी बोलताना एचडीएफसी बँकेचे डीएमडी श्री. कैझाद भरूचा म्हणाले, “टेक्नॉलॉजी-सक्षम शिक्षण, सुधारित कृषी उत्पादकता, अक्षय ऊर्जा आणि आजीविकेच्या संधींपर्यंत पोहोच प्रदान करून आम्ही भारताच्या सीमावर्ती गावांमध्ये अर्थपूर्ण प्रभाव निर्माण करण्याबाबत वचनबद्ध आहोत. राष्ट्रीय विकास लक्ष्यांशी सुसंगत राहून आम्ही स्थानिक समुदाय, एनजीओ आणि सरकारी संस्थांशी भागीदारी करतो आणि असे समर्थ, आत्मनिर्भर आणि ऊर्जावान समुदाय घडवतो, जे देशाच्या आर्थिक आणि सामाजिक जडणघडणीत योगदान देतात.”

        एचडीएफसी बँकेचे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे प्रमुख नुसरत पठाण म्हणाले, “ग्रामिक विकासाप्रती एक सर्वंकष दृष्टिकोन असणे हे केवळ इष्ट नाही, तर त्याची आत्यंतिक गरज आहे, विशेषतः सीमावर्ती भागांमध्ये. आम्ही याची खातरजमा करतो की, एका क्षेत्रातील प्रगती इतर क्षेत्रांमधील सकारात्मक परिणामांना मजबूती देईल आणि ते परिणाम वाढवेल आणि त्यायोगे आमच्या कार्याचा प्रभाव जास्तत जास्त दिसेल.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In बँकिंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…