Home शासकीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली नशामुक्त भारताचे स्वप्न साकार होत आहे: अमित शहा

मोदीजींच्या नेतृत्वाखाली नशामुक्त भारताचे स्वप्न साकार होत आहे: अमित शहा

6 second read
0
0
35

no images were found

मोदीजींच्या नेतृत्वाखाली नशामुक्त भारताचे स्वप्न साकार होत आहे: अमित शहा

 
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी रविवारी ड्रग्जचा व्यापार आणि त्याच्या धोक्याचा सामना करण्यात मोदी सरकारच्या यशाबद्दल तीन व्हिडिओ जारी केले. देशातील ड्रग्ज शोधणे, ड्रग्ज नेटवर्क नष्ट करणे, गुन्हेगारांना अटक करणे आणि ड्रग्जच्या व्यसनाधीनांचे पुनर्वसन याद्वारे नशामुक्त भारताचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने मोदी सरकार वेगाने वाटचाल करत आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली नशामुक्त भारत ही येणाऱ्या पिढ्यांना मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे.
स्वातंत्र्याच्या सुवर्णकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कठोर पध्दतीने आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली ड्रग्जच्या व्यापाराला आळा घालण्याची तयारी जोरात सुरू आहे, त्यामुळे अटक झालेल्यांची संख्या आणि जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचे प्रमाण वाढले आहे. शाह यांच्या भक्कम धोरणांमुळे, आज सरकार आणि एजन्सींमधील समन्वय, सहकार्य आणि सामंजस्यमुळे देशभरात एक मजबूत ड्रग्ज विरोधी यंत्रणा निर्माण झाली आहे आणि या धोरणामुळे ड्रग्ज जप्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.
मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध ड्रग्जच्या व्यापाराला आळा घालण्यासाठी गृह मंत्रालयाने केलेल्या बहुआयामी प्रयत्नांमुळे जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जच्या प्रमाणात जवळपास 100% वाढ झाली आहे आणि त्याचा व्यवहार करणाऱ्यांवर नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये 152% वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, 2006 ते 2013 या कालावधीत नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या 1,257 होती, जी 2014-2023 या वर्षात 3 पटीने वाढून 3,755 झाली. 2006-13 मध्ये 1,363 गुन्हेगारांना अटक झाली होती आणि 2014-23 या कालावधीत त्यांची संख्या 4 पटीने वाढून 5,745 झाली. गेल्या काही वर्षात जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचे प्रमाण दुप्पट होऊन 3.95 लाख किलोग्रॅम झाले, जे 2006-13 मध्ये 1.52 लाख किलोग्रॅम होते. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत 2006-13 या कालावधीत 768 कोटी रुपयांवरून 30 पटीने वाढून 22,000 कोटी रुपये झाली. मोदीजींच्या नेतृत्वामुळे आणि शाह यांच्या दूरदृष्टीमुळे, ड्रग्ज विरोधी एजन्सींनी 12,000 कोटी रुपयांचे 12 लाख किलोग्रॅम ड्रग्ज नष्ट करण्याचे अभूतपूर्व काम केले. नशामुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, 2019 मध्ये, ड्रग्ज विरुद्ध कारवाई करणाऱ्या केंद्र आणि राज्य एजन्सींमध्ये उत्तम समन्वय साधण्यासाठी  चार-स्तरीय NCORD यंत्रणा मजबूत करण्यासाठी देखील काम करण्यात आले.
अमित शहा यांच्या मोदी सरकारच्या नशामुक्त नवीन भारत निर्माण करण्याच्या रणनीतीचे परिणाम दिसून येत आहेत, हे केवळ देशानेच नाही तर जगभरातील जनतेने पाहिले आहे.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…