
no images were found
उद्धव ठाकरे भाजपाविरोधात आक्रमक
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातच आपल्याला काम करायचं आहे असं आवाहन आज चंद्रकांत खैरे यांनी संभाजी नगर यांनी केलं आहे. तसंच संभाजी नगर हा बाळासाहेब ठाकरेंचा गड होता आणि आता उद्धव ठाकरेंचा गड आहे हे लक्षात ठेवा. आपण शिवसेना प्रमुखांचे सैनिक आहेत. काही दिवसांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे.
संभाजीनगरच्या सभेत चंद्रकांत खैरे म्हणाले, “जो लोक सोडून गेले ते कुणामुळे मोठे झाले? संदिपान भुमरेंचं ऐकून पोलिसांनी आम्हाला परवानगी नाकरली होती. अशा पद्धतीने करत असाल.. तर सांगतो काही दिवसांनी उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आणि आम्ही सत्ताधारी असू. तेव्हा तुम्ही काय कराल?” असा प्रश्न खैरे यांनी विचारला आहे. तसंच उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असा दावाही त्यांनी केला आहे.
आपल्या भाषणात खैरै म्हणाले, “त्या इम्तियाज जलीलने काही दिवसांपूर्वी आदर्श बँकेचा घोटाळा बाहेर काढला आणि आंदोलनं केली. जो भ्रष्टाचारी माणूस आहे तोच हे सगळं करत होता. दारु, गुटखा यांचे धंदे करतो. आदर्श बँकेत कुणाचा पैसा आहे तर इम्तियाज जलील आणि त्यांच्या माणसांचा आहे.” असाही आरोप खैरेंनी केला. चंद्रकांत खैरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरेंनीही भाषण केलं. त्यांनी त्यांच्या भाषणात अशोक चव्हाण आणि भाजपावर कडाडून टीका केली.