Home क्राईम पानसरे खून खटल्याची सुनावणी कोल्हापुरात व्हावी, ATS ची कोर्टात मागणी

पानसरे खून खटल्याची सुनावणी कोल्हापुरात व्हावी, ATS ची कोर्टात मागणी

1 second read
0
0
56

no images were found

पानसरे खून खटल्याची सुनावणी कोल्हापुरात व्हावी, ATS ची कोर्टात मागणी
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांचा खून खटला कोल्हापुरातीलच न्यायालयात चालावा, याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे दिला आहे, असा अहवाल दहशतवाद विरोधी पथकाचे अधीक्षक तुषार दोशी यांनी आज विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांच्यामार्फ येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांच्या न्यायालयात सादर केला. यावेळी एस आय टी चे प्रमुख व अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे हे सुद्धा न्यायालयात हजर होते. पुढील सुनावणी 19 सप्टेंबरला होणार आहे. दरम्यानच्या महाराष्ट्र शासनाकडून हा खटला कोठे चालवावा याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
पानसरे खटल्यातील साक्षीदार, पंच हे कोल्हापूर आणि परिसरातील आहेत. तसेच दहशतवाद विरोधी पथक सोलापूर यांच्या कार्यक्षेत्रामध्येच कोल्हापूर जिल्हा आहे. खटल्यातील साक्षीदार, पंच, संशयित आरोपी यांना सोलापूर न्यायालयात ये-जा करणे जोखमीचे होणार आहे. त्यामुळे हा खटला कोल्हापूर जिल्ह्यातीलच न्यायालयात चालवावा, असा अहवाल दहशतवाद विरोधी पथकाकडून महाराष्ट्र शासनाला पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, पानसरे खून खटल्यातील संशयित पहिला आरोपी समीर गायकवाड हा सुद्धा आज न्यायालयात हजर होता. तपास (एटीएस) दहशतवाद विरोधी पथक यांच्याकडे देण्यात आला असल्याने (एसआयटी) विशेष तपास पथक यांच्याकडे हजेरी द्यावी की नाही मुद्दा संशयित आरोपींच्या वकील प्रीती पाटील यांनी उपस्थित केला. यावर ऍड. राणे यांनी एटीएस अधिकाऱ्यांची चर्चा करून पुढील सुनावणीपर्यंत गायकवाड याने कोल्हापुरात एसआयटी मध्येच प्रत्येक रविवारी हजेरी द्यावी अशी विनंती केली. यावर न्यायाधीश तांबे यांनी पुढील सुनावणीपर्यंत कोल्हापुरातच हजेरी द्यावी असे आदेश दिले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प

  ‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प   कोल्हापू…