बलिदान दिनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना शिवसेनेच्यावतीने विनम्र अभिवादन कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना लहानपणापासूनच मिळाले. छत्रपती संभाजी महाराज यांनी सर्व सुखांचा त्याग करून निरंतर ९ वर्षे स्वराज्याच्या रक्षणासाठी संघर्ष केला. छत्रपती संभाजी महाराज हे शूर, पराक्रमी तर होतेच, शिवाय रयतेच्या हिताला प्राधान्य देणारे ते आदर्श …