वाचनातून जाणिवासमृद्ध माणूसपण घडते: डॉ. धनंजय देवळालकर कोल्हापूर,(प्रतिनीधी):-वाचन ही सातत्यपूर्ण प्रक्रिया असून वाचनातूनच जाणिवासमृद्ध माणूसपण घडते, असे प्रतिपादन राजाराम महाविद्यालयातील डॉ. धनंजय देवळालकर यांनी आज येथे केले. महाराष्ट्र शासनाच्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात आज सकाळी वाचन कौशल्य कार्यशाळा आणि सामूहिक वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के …