नैसर्गिक शेतीमध्ये महिलांचे योगदान महत्वाचे -‘आत्मा’ उपसंचालक रवींद्र तागड तळसंदे (प्रतिनिधी):- नैसर्गिक शेतीत महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे. या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबन व पर्यावरणपूरक शेतीची संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे महिला शेतकऱ्यानी नैसर्गिक शेतीकडे वळावे असे प्रतिपादन आत्मा कोल्हापूरचे उपसंचालक रवींद्र तागड यांनी केले. कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे येथे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत महिलांसाठी नैसर्गिक शेतीवरील ‘सखी प्रशिक्षण कार्यक्रमा’च्या उद्घाटन …