कवी-साहित्यिकांनी संवेदनांचे संवर्धन करावे: भारत सासणे कोल्हापूर (प्रतिनिधी): कवितेच्या माध्यमातून परतत्त्वाचे संरक्षण आणि संवेदनांचे संवर्धन करण्याचा आजचा कालखंड असून त्याद्वारे समाजाची सर्वंकष समज वाढविण्याचा कवी-साहित्यिकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या सन २०२४च्या सतीश काळसेकर व ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कारांच्या प्रदान …