Home Video एस एस सर्व्हिसेसचा चालू त्रिपक्षीय करार रद्द करण्याच्या घोटाळ्याची चौकशी व्हावी

एस एस सर्व्हिसेसचा चालू त्रिपक्षीय करार रद्द करण्याच्या घोटाळ्याची चौकशी व्हावी

17 second read
0
0
7

no images were found

एस एस सर्व्हिसेसचा चालू त्रिपक्षीय करार रद्द करण्याच्या घोटाळ्याची चौकशी व्हावी

कोल्हापूर(प्रतिनिधी): मे. एस एस सर्व्हिसेस, इचलकरंजी यांची इचलकरंजी महानगरपालिका, इचलकरंजीमधील खाजगी तसेच सरकारी रुग्णालयांमधून जैव वैद्यकीय कचरा संकलन, वाहतूक, प्रक्रिया आणि निर्मुलन करण्यासाठी सुरुवातीला १५ वर्षांच्या कालावधीसाठी ऑपरेटर/सुविधा देणारे म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. हा करार इचलकरंजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, आणि मेडिकल असोसिएशन इचलकरंजीचे अध्यक्ष , आरोग्य अधिकारी, इचलकरंजी नगरपरिषद आणि एस एस सर्व्हिसेस यांच्यात दि.०४.०२.२००३ रोजी झालेल्या त्रिपक्षीय करारांतर्गत करण्यात आला आहे. तत्कालीन नगरपरिषदेने ७१२ चौ. मीटर मोकळी जागा आणि

त्यावरील शेड दरमहा रु.१,५००/- भाड्याने या अटीवर दिले आहे. इचलकरंजी नगरपरिषदेद्वारे जैव वैद्यकीय कचरा संकलन, वाहतूक, प्रक्रिया आणि निर्मुलन एस एस सर्व्हिसेस यांनी मोफत / विना मोबदला सेवा देण्याचे ठरले आहे.त्रिपक्षीय कराराच्या अनुषंगाने एस एस सर्व्हिसेसने इचलकरंजीतील रुग्णालयातून गोळा केलेल्या जैव वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया आणि विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. कंपनीने जैव वैद्यकीय कचरा गोळा करण्यासाठी आणि वाहतुकीसाठी वाहने आणि उपकरणे खरेदी केली आहेत आणि वरील कामे करण्यासाठी सुमारे ५० कर्मचारी नियुक्त केले आहेत. इचलकरंजी नगरपरिषदेच्या मालकीच्या भाड्याने दिलेल्या मोकळ्या जागेवर जैव वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया आणि निर्मुलन करण्यासाठी आधुनिक जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प (प्लांट) सन २००३ साली स्थापित केला आहे.
एस एस सर्व्हिसेस यांनी इचलकरंजी महानगरपालिका, शिरोळ, हातकणंगले, शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन (संकलन, वाहतुक, प्रक्रिया आणि निर्मुलन) करणेसाठी “एकत्रित संमती आणि जैव वैद्यकीय कचरा प्रधिकारपत्र प्राप्त केले आहे.
सन २००३ साली १५ वर्षाकरिता केलेल्या त्रिपक्षीय कराराची मुदत संपले कारणाने तसेच एस एस सर्विसेस यांचे कामाबाबत सन २००३ सालापासून एकही तक्रार नसले कारणाने तत्कालीन नगरपरिषद, इचलकरंजीच्या सर्वसाधारण सभेने दि.३१.०५.२०१८ रोजी झालेल्या बैठकीत इचलकरंजी नगरपालिकेच्या हद्दीतील रुग्णालयांमध्ये जैव वैद्यकीय कचरा संकलन, वाहतूक, प्रक्रिया आणि निर्मुलनाबाबतचा करार पुढील १५ वर्षांच्या कालावधीसाठी नूतनीकरण करण्याचा किंवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, त्रिपक्षीय करार करण्यात आला आहे. दरम्यान, इचलकरंजी नगरपरिषदेचे रुपांतर सन २०२२ साली इचलकरंजी महानगरपालिकामध्ये झाले.
नगरसेवक राजू बोंद्रे, (मोबाईल नं. ९८२२८६६६८८) यांनी एस एस सर्व्हिसेसचे महाव्यवस्थापक सागर जाधव (मोबाईल नं. ९४२०५४५७९८) यांच्याशी दि. २४.०६.२०२६ रोजी व्हॉट्सअप कॉलिंगवर संपर्क साधला आणि त्यांना सांगितले की “मला तुमच्या जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये स्लीपिंग पार्टनर म्हणून ५० टक्के नफ्यासह घेण्यात यावे, असे न केल्यास तुमचा करार संपुष्टात आणला जाईल आणि जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा करार अप्पासो जाधव यांच्या कंपनीला दिला जाईल”.असे सांगितले.एस .एस सर्व्हिसेसच्या भागीदारांनी राजू बोंद्रे यांना ५० टक्के नफा देण्याच्या कल्पनेला सहमती दर्शवली नाही.इचलकरंजी महानगरपालिकेचे महापौर उदय धातूंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष सतीश मुळीक आणि नगरसेवक राजू बोंद्रे यांनी एस एस सर्व्हिसेसच्या भागीदारांना दि. ०१.०७.२०२६ रोजी महापौर यांचे दालनात बोलावले आणि “महापालिकेने एस एस सर्व्हिसेसचा त्रिपक्षीय करार संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्रिपक्षीय करार रद्द करण्याच्या विरोधात न्यायालय किंवा इतर कोणत्याही प्राधिकरणाकडे न जाण्याचा इशारा दिला, अन्यथा एस एस सर्व्हिसेसला काळ्या यादीत टाकले जाईल. प्रकल्प आणि त्याची यंत्रसामग्री जप्त केली जाईल आणि आप्पा जाधवच्या एजन्सीच्या ताब्यात दिली जाईल”. असे सांगितले. एस एस सर्व्हिसेसच्या भागीदारांनी सदर धमक्या गांभीर्याने घेतल्या नाहीत. त्रिपक्षीय करार अकाली संपुष्टात आणल्याने तांत्रिक आणि कायदेशीर गुंतागुंत निर्माण होईल आणि जैव वैद्यकीय कचरा संकलन, वाहतूक, प्रक्रिया आणि निर्मुलन करण्यामध्ये अचानक व्यत्यय आल्यास जनतेच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होईल. विशेषतः जेव्हा मेडिकल असोसिएशन इचलकरंजी किंवा जनतेकडून एस एस सर्व्हिसेसच्या विरोधात आज अखेर कोणतीही तक्रार नाही.
त्रिपक्षीय करार संपुष्टात आणण्याचा आणि इचलकरंजी येथील सिटी सर्व्हे क्र. ६३८ मधील मोकळी जमीन भाड्याने देण्यासाठी नव्याने निविदा मागवण्याचा निर्णय घेण्यात आला. सुमारे ७-८ नगरसेवकांनी अशा चुकीच्या चाललेल्या हालचालीला हरकत घेऊन जोरदार विरोध केला परंतु सत्ताधारी गटामध्ये नगरसेवकांची संख्याबळ जास्त असलेने संख्याबळाच्या जोरावर बहुमताने ठराव मंजूर करण्यात आला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तीन निविदाकार; जसे की i) बायोक्लीन सिस्टम प्रा. लि., अहमदनगर; ii) लाइफ सिक्युअर एंटरप्रायझेस, तळेगाव दाभाडे, पुणे आणि iii) श्री गोविंद बायो-मेडिकल प्रा. लि., सिंधुदुर्ग यांनी संगनमत करून आणि त्यांच्यापैकी एकाने म्हणजेच श्री गोविंद बायो-मेडिकलने निविदा करार मिळवला. आप्पासो जाधव, श्रीकांत खैरे आणि मुजीब पटेल हे निविदा सादर केलेल्या वरील तीनही एजन्सीमध्ये संचालक किंवा भागीदार आहेत. आम्हाला पुढे असे समजले आहे की,
नगरसेवक राजू बोंद्रे, आणि स्थायी समितीचे अध्यक्ष सतीश मुळीक यांना गोविंद बायो-मेडिकलमध्ये तिचे अध्यक्ष अप्पासो जाधव यांनी स्लीपिंग पार्टनर बनवले आहे.
तरी गोविंद बायो-मेडिकल प्रायव्हेट लिमिटेड या फसव्या संस्थेला जमिनीचे वाटप करणे, घोटाळ्यात सामील असलेल्या सर्वांवर गुन्हे दाखल करणे आणि तपास सीबीआय (CBI) किंवा ईओडब्ल्यू (EOW) कडे सोपवावा अशी मागणी एस एस सर्व्हिसेस व्यवस्थापकीय संचालक सागर जाधव यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
गोविंद बायो-मेडिकलकडे जैव वैद्यकीय कचरा गोळा करण्यासाठी आणि वाहतूक करण्यासाठी प्रक्रिया प्रकल्प नाही किंवा MPCB (महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ) मान्यताप्राप्त अधिकृत वाहने आणि उपकरणे नाहीत.
नगरसेवक राजू बोंद्रे, श्री गोविंद बायो-मेडिकलचे अध्यक्ष आप्पासो जाधव यांच्यासोबत असलेल्या ८-१० गुंडांसह जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये प्रवेश करून कर्मचाऱ्यांना सांगितले की ‘हा प्रकल्प श्री गोविंद बायो-मेडिकलकडे हस्तांतरित करण्यात आला आहे आणि एस एस सर्विसेसच्या कामगारांनी त्वरित प्रकल्पाबाहेर जावे”
त्यांनी ५ मिनिटांत प्रकल्पाबाहेर जावा अन्यथा ते पोलिसांना बोलावतील आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करतील.
त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील या भीतीने एकामागून एक कर्मचाऱ्यांना प्लांट सोडावा लागला.
स्थायी समितीचे अध्यक्ष सतीश मुळीक यांना हाताशी धरून नगरसेवक राजू बोंद्रे यांनी हा संपूर्ण दुष्ट हेतूने कट रचला होता याची आम्हाला खात्री आहे.
महाराष्ट्र शासन आणि त्यांचे अधिकारी अशा मोठ्या प्रमाणावरील घोटाळ्याकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. आणि करू नये. किंवा लपवू शकत नाहीत.
याप्रकरणी कोल्हापूर सर्किट बेंच येथे दाद मागितली आहे.
मुख्य मागणी:
१) नगरसेवक राजू बोंद्रे, सतीश मुळीक,श्रीकांत पाटील आणि महानगरपालिकेचे याप्रकरणाशी संबंधित अधिकारी ज्याच्याशी संगनमत करून आप्पासो जाधव यांनी रिकामी जमीन देण्याचे टेंडर काढून चालू जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प (सर्व यंत्रसामुग्रीसह) हडप केले प्रकरणी आणि केलेली लुटालूट, तोडफोड आणि नासधूस प्रकरणी गुन्हे दाखल करून, शिस्तभंगाची चौकशी सुरू करून आणि त्यांच्यावर प्रशासकीय आणि दंडात्मक कारवाई अत्यंत तत्परतेने करावी.
२) महानगरपालिकेच्या अधिकारी आणि आप्पासो जाधव यांनी हातमिळवणी करून केलेली चुकीची टेंडर प्रक्रिया रद्द करावी.
हडप केलेला एस एस सर्विसेसचा चालू जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प (सर्व यंत्रसामुग्रीसह) त्वरित ताबा देऊन न्याय मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पत्रकार परिषदेस सागर जाधव,
आशिष घाटगे, श्वेता ढेरेकर उपस्थित होते.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे

पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे क…