Home संशोधन संशोधन समाजोपयोगी, बाजारपेठेसाठी उपयुक्त असावे: डॉ. राजाराम गुरव

संशोधन समाजोपयोगी, बाजारपेठेसाठी उपयुक्त असावे: डॉ. राजाराम गुरव

0 second read
0
0
14

no images were found

संशोधन समाजोपयोगी, बाजारपेठेसाठी उपयुक्त असावे: डॉ. राजाराम गुरव : शिवाजी विद्यापीठात पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी संशोधन कौशल्य कार्यशाळा
कोल्हापूर,: संशोधन केवळ पदवी संपादन किंवा शैक्षणिक प्रगतीपुरते मर्यादित न राहता समाजासाठी उपयुक्त, परिणामकारक आणि व्यवहार्य असावे. संशोधनातून निर्माण होणाऱ्या नावीन्यपूर्ण कल्पनांचे प्रत्यक्ष उत्पादनांमध्ये, सेवांमध्ये आणि समाजोपयोगी उपक्रमांमध्ये रूपांतर होणे आवश्यक आहे. तसेच संशोधनातून निर्माण होणाऱ्या कल्पना बाजारपेठेच्या गरजा पूर्ण करणाऱ्या व स्वीकारार्ह असाव्यात, अशी अपेक्षा शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव यांनी व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठाचा शिक्षणशास्त्र अधिविभाग आणि संशोधन व विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने पीएम-उषा अंतर्गत पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ‘पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी संशोधन कौशल्ये – गुणवत्तापूर्ण संशोधन आणि शैक्षणिक उत्कृष्टतेचा पाया’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. गुरव बोलत होते.
यावेळी डॉ. गुरव म्हणाले, शिक्षण क्षेत्रातील नावीन्यपूर्ण कल्पनांचे समाजोपयोगी उत्पादनांमध्ये, सेवांमध्ये आणि उपक्रमांमध्ये रूपांतर करण्यासाठी संशोधकांनी प्रयत्नशील राहावे. संशोधनाला व्यावहारिक तसेच उद्योजकीय दृष्टिकोन देण्याची गरज असून, विद्यार्थ्यांनी केवळ संशोधन पूर्ण करण्याऐवजी त्यातून समाजाच्या प्रत्यक्ष गरजा कशा पूर्ण होतील, याचा विचार करावा, असेही आवाहन त्यांनी केले.
शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने संशोधनाच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य केले. संशोधन हे केवळ ज्ञाननिर्मितीपुरते मर्यादित न राहता शिक्षणाची गुणवत्ता वाढविणारे, विद्यार्थीकेंद्रित आणि समाजाच्या गरजा पूर्ण करणारे असावे, असे त्या म्हणाल्या.
समन्वयक डॉ. विद्यानंद खंडागळे यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यशाळेत डॉ. नीलिमा सप्रे, डॉ. राजेंद्र पारिजात आणि डॉ. कुंभार यांनी साधनव्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले. कार्यशाळेस विद्यापीठाच्या विविध अधिविभागांतील पदव्युत्तर विद्यार्थी तसेच शिक्षक उपस्थित होते. रुचिता थरोली यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुप्रिया पाटील यांनी आभार मानले.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संशोधन
Comments are closed.

Check Also

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हजेरीची अचानक तपासणी ; 58 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हजेरीची अचानक तपासणी ; 58 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई…