Home मनोरंजन “पालकांसाठी हा शो मुलांना देऊ शकणाऱ्या सर्वात मोठ्या देणगीची आठवण करून देतो, ती म्हणजे योग्य मूल्यं आणि अढळ चारित्र्य”:मनीष वाधवा

“पालकांसाठी हा शो मुलांना देऊ शकणाऱ्या सर्वात मोठ्या देणगीची आठवण करून देतो, ती म्हणजे योग्य मूल्यं आणि अढळ चारित्र्य”:मनीष वाधवा

2 second read
0
0
4

no images were found

“पालकांसाठी हा शो मुलांना देऊ शकणाऱ्या सर्वात मोठ्या देणगीची आठवण करून देतो, ती म्हणजे योग्य मूल्यं आणि अढळ चारित्र्य”:मनीष वाधवा

सोनी सबचा हस्तिनापुर के वीर प्रेक्षकांसमोर पांडव आणि कौरवांच्या न सांगितलेल्या बालपणीच्या कथा जिवंत करतो. या प्रवासात त्यांच्या नातेसंबंध, मूल्ये आणि अनुभव दाखवले जातात ज्यांनी हस्तिनापुरच्या भविष्यास आकार दिला. या कथानकाच्या केंद्रस्थानी आहे भीष्म पितामह ज्यांची भूमिका मनीष वाधवा यांनी साकारली आहे. ते आपल्या शहाणपणासाठी आणि राज्य तसेच भावी पिढ्यांप्रती असलेल्या अढळ कर्तव्यभावनेसाठी ओळखले जाणारे आदरणीय मार्गदर्शक आहेत.

      या संवादात मनीष वाधवा यांनी भीष्म पितामहसारख्या आयकॉनिक भूमिकेत पाऊल ठेवण्याबद्दल, त्या व्यक्तिरेखेचे सादरीकरण करण्यासाठी घेतलेली त्यांची तयारी, तरुण कलाकारांशी असलेले त्यांचे नाते आणि ‘हस्तिनापुर के वीर’ मधून प्रेक्षकांनी कोणती मूल्ये आत्मसात करावीत अशी त्यांची अपेक्षा याबद्दल सविस्तरपणे सांगितले आहे.

1. महाभारत मधील सर्वात प्रतिष्ठित व्यक्तिरेखा भीष्म पितामह साकारण्याची ऑफर मिळाल्यावर तुमचा पहिला विचार काय होता?

भीष्म पितामह ही भूमिका स्वतःच माझ्यासाठी ‘हो’ म्हणण्याचे सर्वात मोठे कारण ठरली. देवाची कृपा आहे की मला भीष्मसारख्या व्यक्तिरेखेचे पाऊलखुणा साकारण्याची संधी मिळाली. दररोज एखाद्या अभिनेत्याला इतकी आयकॉनिक आणि आदरणीय व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळत नाही. एखादी भूमिका मला उत्साहित करते, आव्हान देते आणि अभिनेता म्हणून वाढण्याची संधी देते, तर मी लगेच तिच्याकडे आकर्षित होतो. भीष्म पितामह ही अशीच एक व्यक्तिरेखा आहे आणि पडद्यावर त्यांना जिवंत करण्याचा सन्मान मला मिळणे खरोखरच अभिमानास्पद आहे.

2. प्रत्येक अभिनेता एखाद्या प्रसिद्ध व्यक्तिरेखेला स्वतःची वेगळी ओळख देतो. तुम्ही भीष्म पितामह साकारताना कोणता दृष्टिकोन स्वीकारला?

माझा दृष्टिकोन असा होता की मी भीष्म पितामह यांच्याबद्दल वर्षानुवर्षे जे वाचले, ऐकले आणि शिकले आहे त्यावर आधारित त्यांना साकारावे. ते शहाणपण, त्याग आणि आपल्या तत्त्वांप्रती अढळ निष्ठा यासाठी ओळखले जातात आणि मी त्या गुणांना प्रामाणिकपणे आणि खरीपणे पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी मला वाटते की प्रत्येक सादरीकरणाला स्वतःची ओळख असावी कारण प्रत्येक अभिनेता व्यक्तिरेखेशी वेगळ्या पद्धतीने जोडला जातो. माझा प्रयत्न असा आहे की भीष्म पितामह यांना त्यांच्या वारशाशी प्रामाणिक राहून सादर करावे आणि त्याचबरोबर माझा स्वतःचा दृष्टिकोन आणि अनुभव या भूमिकेत आणावा.

3. भिष्म पितामह यांच्या गुणांपैकी तुम्ही वैयक्तिकरित्या कोणत्या गुणाशी सर्वात जास्त जोडलेले आहात?

भिष्म पितामह यांच्या अनेक प्रशंसनीय गुणांपैकी मला सर्वात जास्त जोडलेला वाटतो तो त्यांच्या शिस्त, बुद्धिमत्ता आणि कर्तव्याप्रती असलेल्या अढळ निष्ठेशी. हे गुणच त्यांना कालातीत आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व बनवतात. कलाकार म्हणून माझा ठाम विश्वास आहे की शिस्त ही आपल्या कलेची पायाभरणी आहे, तर बुद्धिमत्ता आणि जबाबदारी आपल्याला व्यावसायिक तसेच वैयक्तिक आयुष्यात योग्य दिशा दाखवतात. मी माझं काम पूर्ण प्रामाणिकपणे करतो आणि कामाचं महत्त्व समजतो — ही शिकवण आपल्याला भिष्मांकडून घ्यायला हवी. अनेक अर्थांनी मी माझ्या प्रवासात या मूल्यांना आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो आणि मला वाटतं की प्रत्येक कलाकारासाठी हे गुण अत्यंत आवश्यक आहेत.

4. हस्तिनापुर के वीर’ ही मालिका पांडव आणि कौरवांच्या बालपणीच्या वर्षांवर आधारित आहे. या कथेत प्रेक्षकांना भिष्म पितामहांचा एक नवा पैलू पाहायला मिळतो का?

भिष्म पितामह हा एक अत्यंत स्तरित आणि गहन व्यक्तिमत्त्व असलेला पात्र आहे आणि ‘हस्तिनापुर के वीर’ या मालिकेत प्रेक्षकांना त्यांचा अधिक जिव्हाळ्याचा, संवेदनशील आणि करुणामय पैलू पाहायला मिळतो. मालिकेत पांडव आणि कौरवांवरील त्यांचे अपार प्रेम आणि काळजी अधोरेखित केली जाते. ते नेहमी निष्पक्ष राहतात आणि प्रत्येक मुलाला समान वागणूक देतात, सतत त्यांना बुद्धीमत्तेने आणि काळजीपूर्वक मार्गदर्शन करतात. प्रेक्षकांना फक्त हस्तिनापुरचा आदरणीय रक्षकच नव्हे तर एक संरक्षक मार्गदर्शक आणि आजोबांसारखा स्नेही व्यक्ती पाहायला मिळतो, ज्यांच्या प्रेमळ मार्गदर्शनाने पुढची पिढी घडते. ते फक्त मुलांचेच नव्हे तर पालकांचेही मार्गदर्शक ठरतात.

5. पौराणिक मालिकांमध्ये कलाकाराला एक वेगळी उपस्थिती आणि देहबोलीची गरज असते. भिष्म पितामहासाठी तुम्ही या पैलूंवर कशी मेहनत घेतली?

प्रत्येक पात्र, मग ते ऐतिहासिक असो, पौराणिक असो किंवा समकालीन, त्यासाठी वेगळी शारीरिकता आणि उपस्थिती आवश्यक असते. भिष्म पितामहासाठी केवळ त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला समजून घेणं पुरेसं नव्हतं, तर ते स्वतःला कसे सादर करत असतील त्यांची चाल, बसण्याची पद्धत, बोलण्याची शैली आणि वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये त्यांची प्रतिक्रिया कशी असेल हे जाणून घेणंही महत्त्वाचं होतं. पात्राचा अभ्यास करण्याबरोबरच मी शारीरिक तयारीवरही लक्ष केंद्रित केलं. नियमित वर्कआउट, योग आणि ट्रेनिंगच्या माध्यमातून या भूमिकेसाठी आवश्यक ताकद आणि सौंदर्य आणण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या घटकांनी मिळून ती आभा, ती गरिमा आणि ती प्रभावी उपस्थिती निर्माण झाली, जी प्रेक्षक भिष्म पितामहाशी जोडतात.

6. तुम्ही सेटवरच्या तरुण कलाकारांशी एक खास नातं शेअर करता. इतक्या मोठ्या कलाकारांच्या समूहासोबत काम करण्याचा अनुभव कसा राहिला?

तरुण कलाकारांसोबत काम करणं हा खरोखरच एक सुंदर अनुभव ठरला आहे. ते पांडवांची भूमिका करत असोत किंवा कौरवांची, प्रत्येक मुलं अत्यंत गुणी, प्रामाणिक आणि उत्साहाने भरलेली आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे सेटवर एक वेगळी ऊर्जा निर्माण होते आणि त्यांच्यासोबत वेळ घालवताना मला खूप आनंद मिळतो. कलाकार म्हणून मला त्यांची प्रामाणिकता आणि सहजता सर्वात जास्त भावते. ऑफ‑स्क्रीन अनेक मुलं मला प्रेमाने ‘पितामह’ किंवा ‘दादू’ म्हणतात, ज्यामुळे आमचं नातं आणखी खास बनतं. या मुलांनी मला फादर्स डेच्या दिवशी एक अप्रतिम सरप्राईज दिलं. ते माझ्या मांडीवर बसून खेळतात. आम्ही खूप हशा‑मस्करी करतो, गप्पा मारतो आणि दृश्यांदरम्यान अनेक संस्मरणीय क्षण शेअर करतो. त्यामुळे सेटवर एक उबदार आणि सकारात्मक वातावरण तयार होतं.

7. अनुभवी अभिनेता म्हणून तुम्हाला कधी कधी तरुण कलाकारांना मार्गदर्शन करावं लागतं का? तुम्ही त्यांना साधारणपणे कोणते सल्ले देता?

जेव्हा मला संधी मिळते तेव्हा मी माझ्या अनुभवातून काही धडे तरुण कलाकारांशी शेअर करतो. मी त्यांना हेही आठवण करून देतो की त्यांनी आपलं बालपण एन्जॉय करावं, ऑफ‑स्क्रीन मजा करावी आणि जेव्हा परफॉर्म करण्याची वेळ येते तेव्हा पूर्ण लक्ष आणि समर्पण द्यावं. एक गोष्ट मी नेहमी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो ती म्हणजे सकारात्मक किंवा नकारात्मक कमेंट्समध्ये वाहवत जाऊ नये. जर तुम्ही खूप जास्त प्रशंसेवर लक्ष केंद्रित केलं तर अनावश्यक अहंकार येऊ शकतो, आणि जर तुम्ही टीकेवर खूप जास्त लक्ष दिलं तर ते तुम्हाला निरुत्साही करू शकतं.

मी त्यांना हेही सांगतो की ऑन‑स्क्रीन आपल्या पात्रात पूर्णपणे रमायला हवं, पण त्याच वेळी स्वतःची ओळख कधीही गमावू नये. जेव्हा मी कॅमेऱ्यासमोर उभा राहतो तेव्हा मी भिष्म पितामह बनतो, पण शॉट संपताच मी पुन्हा मनीष वधवा होतो. मी मुलांना नेहमीच प्रोत्साहित करतो की त्यांनी अभिनयाकडे याच पद्धतीने पाहावं आपल्या पात्रातील सकारात्मक गुण शिकावेत, पण ती भूमिका सतत आपल्या सोबत घेऊन फिरू नये.

8. आजच्या प्रेक्षकांना, विशेषतः पालकांना, तुमच्या पात्रातून आणि या मालिकेतून तुम्ही काय शिकवण घेऊन जाण्याची अपेक्षा करता?

माझा विश्वास आहे की ‘हस्तिनापुर के वीर’ ही मालिका केवळ एक पौराणिक कथा नाही; ती आजही लागू होणाऱ्या मूल्यांचा आणि जीवनातील धड्यांचा आरसा आहे. पालकांसाठी ही मालिका एक ताकदवान आठवण आहे की मुलांना देऊ शकणारी सर्वात मोठी देणगी म्हणजे मजबूत मूल्यं आणि अढळ व्यक्तिमत्त्व. मुलं ही ओल्या मातीसारखी असतात त्यांना कोणत्याही आकारात घडवता येतं, आणि योग्य आकार देण्याची जबाबदारी ही पालकांची असते. मालिकेत माझं पात्र ‘जसं पेराल तसं उगवेल’ हा संदेश देतं. ही कथा उपदेश करत नाही, तर विचार करायला प्रवृत्त करते आणि आपल्याला स्वतःबद्दल व आपल्या मुलांबद्दल चिंतन करण्याची संधी देते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

मिळकत नाव हस्तांतरणासाठी ७ जुलै रोजी विशेष कॅम्प

मिळकत नाव हस्तांतरणासाठी ७ जुलै रोजी विशेष कॅम्प कोल्हापूर,  : शहरातील अनेक मिळकतींवर…