
no images were found
सावरकरांवरील टीकेनंतर भारत जोडो यात्रा चर्चेत
मुंबई : काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा सावरकरांवरील टीकेनंतर यात्रा खऱ्या अर्थाने चर्चेत आणि प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. यामुळे भारत जोडो यात्रेबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली.
सध्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेचे आगमण ७ नोव्हेंबर रोजी झालं होतं. मात्र मागील दहा दिवसांच्या काळात भारत जोडो यात्रेची म्हणावी तशी चर्चा महाराष्ट्रात झाली नाही. शिवाय माध्यमांनी देखील भारत जोडो यात्रेला महत्त्व दिलं नसल्याचं चित्र होतं. मात्र राहुल गांधी यांच्या शेगाव येथील सभेला मिळाले प्रतिसाद आणि झालेली चर्चा पाहता किमान महाराष्ट्रात तरी भारत जोडो यात्रा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.
महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा दाखल झाल्यानंतर दररोज काही ना काही राजकीय घडामोड घडत होत्या. किंबहुना या घडामोडी घडवून आणल्या जात होत्या, अशी चर्चा सुरु होती. त्यामुळे भारत जोडो यात्रेला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही.
अब्दुल सत्तारांचं सुप्रिया सुळेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, हर हर महादेव चित्रपटावरुन वाद, संजय राऊतांना जामीन, अफजलखान कबरीजवळचे अतिक्रमण काढले, जितेंद्र आव्हाडांना अटक, जितेंद्र आव्हाडांना जामीन, ठाण्यात एका कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र आणि व्हाडांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल. या घटनांमुळे भारत जोडो यात्रा दुर्लक्षित झाल्याचं पाहायला मिळालं होतं. ]\
मात्र बिरसा मुंडा जयंतीला राहुल गांधींनी केलेल्या सावरकरांवरील टीकेनंतर भारत जोडो यात्रा खऱ्या अर्थाने चर्चेत आली. वाशिमच्या जाहीरसभेत राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केली होती. या टीकेनंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. १६ नोव्हेंबरला सावरकरांबद्दल टीकेचा दाखला देत खासदार राहुल शेवाळेंकडून भारत जोडो यात्रा बंद करण्याची मागणी करण्यात आली. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी देखील राहुल गांधींच्या विधानाचा समाचार घेतला होता.
त्यानंतर १७ नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंनी राहुल गांधी यांच्या विधानावर प्रतिक्रिया देत असहमती दर्शविली. तर भाजपकडून राज्यभर निषेध आंदोलन करण्यात आले. अर्थात यामुळे सर्वत्र राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रा चर्चेत आली. मनसेने देखील राहुल यांच्या यात्रेला विरोध केला. त्यानंतर शेगावच्या सभेत राहुल सारवकरांबाबत काय बोलणार याकडे सर्वचेच लक्ष लागले होते. शिवाय सर्व माध्यमांनी राहुल यांची सभा लाईव्ह दाखवली. त्यामुळे दुर्लक्षित झालेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रीतील प्रवासाच्या अखेरच्या टप्प्यात आघाडीवर आलेली पाहायला मिळाली.