no images were found
यावर्षीचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि महाराष्ट्राच्या प्रगतीला चालना देणारा: खा. धनंजय महाडिक
कोल्हापूर (प्रतिनिधी):दिलेला शब्द आणि आश्वासन पाळण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कार्यपध्दती आहे. राज्याचा यावर्षीचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि महाराष्ट्राच्या प्रगतीला चालना देणारा आहे. शेतकरी कर्जमाफी देतानाच महायुती सरकारने पायाभूत सुविधांचा विकास, पर्यटन आणि क्रीडा क्षेत्रासाठी भरघोस योजना, आधुनिक शेती तंत्रज्ञान, डिजिटल महाराष्ट्र, महिलांसाठी नाविन्यपुर्ण योजना घोषीत केल्या आहेत. महाराष्ट्राचा हा अर्थसंकल्प म्हणजे महायुतीची विकासाची दृष्टी स्पष्ट करणारा आणि राज्याच्या प्रगतीची ब्ल्यू प्रिंंट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्र देशातील नंबर एकचे राज्य बनले असून, शाश्वत विकास आणि सुशासन यांची हमी देणारा हा अर्थसंकल्प आहे.