no images were found
‘गणेश कार्तिकेय’ मालिकेत जाणून घ्या ती दंतकथा, जेव्हा बाप्पा दिव्य चिंतामणीच्या रक्षणार्थ पुढे येतात
सोनी सबवरील ‘गाथा शिव परिवार की – गणेश कार्तिकेय’ मालिकेत गणेशाच्या (निर्णय समाधिया) दिव्य प्रवासाचे चित्रण आहे, ज्यामध्ये भगवान गणेशाचा सामना सिंधुरासुराने पसरवलेल्या दुर्गुणांशी होतो. गणेश अष्टविनायक यात्रेतील चिंतामणी अध्यायात प्रवेश करत आहेत. यामध्ये दाखवले आहे की, कशाप्रकारे श्रद्धा, संयम आणि सुजाणता आपल्याला इच्छा, भक्ती आणि नैतिक संतुलनाच्या परीक्षेदरम्यान मार्गदर्शन करतात.
आगामी भागांमध्ये, नशा आणि व्यसनाचा दुर्गुण वाढू लागतो, जेव्हा राजकुमार गुण (अभिषेक शर्मा) कपिल ऋषींना (इंद्रनील भट्टाचार्य) भेट म्हणून मिळालेल्या चिंतामणी रत्नाचा दुरुपयोग करू लागतो. गुण मदासुराच्या (प्रसून आर्य) जाळ्यात अडकतो, ज्यामुळे त्याची लालसा आणि आणखी जास्त जास्त मिळवण्याची इच्छा वाढू लागते. या दुर्गुणांचा धोका ओळखून इंद्र देव संतुलन सांभाळण्यासाठी आणि चिंतामणीचा खरा उद्देश जपण्यासाठी गणेशाकडे मदत मागतो. ही श्रद्धा आणि संयमाची परीक्षा असल्याचे ओळखून गणेश ते रत्न परत मिळवण्याच्या आणि नशेने आंधळ्या झालेल्यांना पुन्हा भक्तीकडे वळवण्याच्या दिव्य प्रवासाला निघतो. हुशारी, सोंग आणि दिव्य लीलांच्या माध्यमातून गणेश गैरवापर आणि अतिरेकाच्या मागचे सत्य उघड करतो आणि सगळ्यांना ही जाणीव करून देतो की, खरी ताकद संपत्तीत नसून श्रद्धा आणि धर्माचरणात आहे.
गणेशाची भूमिका करणारा निर्णय समाधिया म्हणतो, “मी जेव्हा चिंतामणी कथेविषयीची पटकथा वाचली, आणि मदासुराच्या अंमलाखाली गुण कशाप्रकारे चिंतामणीचा दुरुपयोग करू लागतो, हे वाचले, तेव्हा माझ्या हे लक्षात आले की, स्थिर राहणे आणि वरवर आकर्षक दिसणाऱ्या गोष्टींकडे वाहवत न जाणे किती महत्त्वपूर्ण आहे. गणेशाच्या भूमिकेत मी हे दाखवू शकतो की, नियंत्रणाबाहेर गेलेली परिस्थिती देखील प्रज्ञा आणि शांतपणाचा उपयोग करून सुधारता येतात. मला अशी दृश्ये करताना खूप मजा वाटली, जेव्हा भगवान गणेश लोकांना पुन्हा सन्मार्गावर घेऊन येतात, कारण वास्तविक जीवनात देखील आपल्याला अशा मार्गदर्शकाची गरज असते, जो आपल्याला संतुलित राहण्याची आणि योग्य पर्याय निवडण्याची जाणीव देईल.”