Home Video कोल्हापूर महानगरपालिकेत जलस्वराज्य पक्ष–आरपीआय आठवले गट यांची युती:३० जागांवर उमेदवार लढवणार

कोल्हापूर महानगरपालिकेत जलस्वराज्य पक्ष–आरपीआय आठवले गट यांची युती:३० जागांवर उमेदवार लढवणार

5 second read
0
0
39

no images were found

कोल्हापूर महानगरपालिकेत जलस्वराज्य पक्ष–आरपीआय आठवले गट यांची युती:३० जागांवर उमेदवार लढवणार
कोल्हापूर :महानगरपालिका निवडणुकीसाठी जलस्वराज्य पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांची संयुक्त युती झाल्याची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. या युतीच्या वतीने महानगरपालिकेच्या ३० जागांवर उमेदवार निवडणूक लढवणार असल्याची माहिती आमदार अशोक माने, सुमित कदम, आरपीआयचे उत्तम कांबळे व शहाजी कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेले रमेश पुणेकर, विशाल शिराळकर, शांतिनाथ लिंबाणी यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महायुतीचे घटक पक्ष असतानाही आम्ही किमान सन्मानजनक जागांची मागणी केली होती. मात्र शेवटपर्यंत त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. जाणीवपूर्वक वेळकाढूपणा केल्यामुळे कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन आम्ही स्वतंत्र युती करण्याचा निर्णय घेतला असल्याचे उत्तम कांबळे यांनी सांगितले. ही युती निवडणुकीत नक्कीच यश मिळवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आमदार अशोक माने व सुमित कदम यांनी सांगितले की, जलस्वराज्य पक्ष यापूर्वी महानगरपालिकेत सत्तेवर होता आणि कोल्हापूरमध्ये पक्षाचा मोठा समर्थक वर्ग आहे. त्याला आता आरपीआय आठवले गटाची साथ मिळाल्याने ही युती निवडणुकीत दखलपात्र कामगिरी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी ३० प्रभागांतील संभाव्य उमेदवारांची यादीही जाहीर करण्यात आली. यामध्ये विशाल शिराळकर, माजी नगरसेवक रमेश पुणेकर, ऋतुजा मसवेकर, प्रसाद सुजित चव्हाण, महेश बराळे, पृथ्वी अतुल चव्हाण, अमृता सुशांत पवार, मधुरिमा गवळी, माजी नगरसेवक सुभाष रामुगडे, सविता भोसले, योगेश अझाटे आदींचा समावेश आहे. .
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक कोल्हापूर : …