Home Video आप इंडिया गाडीतून बाहेर महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढणार

आप इंडिया गाडीतून बाहेर महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढणार

1 min read
0
0
27

no images were found

आप इंडिया गाडीतून बाहेर महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढणार.                                                                                     कोल्हापूर( प्रतिनिधी ):शहरातील ज्वलंत प्रश्नावर आवाज उठवून आपले रस्त्यावरची लढाई लढणारा पक्ष अशी ओळख निर्माण केली आहे प्रत्यक्ष मैदानात उतरलेल्या आपने आता सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे .                                                          एका बाजूला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे असं म्हणायचं तर दुसऱ्या बाजूला घराणे शैला खतपाणी घालत धनाड्य उमेदवारांना प्राधान्य द्यायचं अशी दुटप्पी धोरण प्रस्थापित पक्षांनी राबवली आहे .                                              गेले दोन आठवडे महाविकास आघाडी सोबत चर्चेची गोळा सुरू होते आपने सुरुवातीला दहा जागांचा प्रस्ताव दिला होता त्यातील सात जागांवर चर्चा करण्याची तयारी काँग्रेसच्या समितीने दाखवली होती परंतु एक आणि दोन जागांवर आम्ही तुमचा विचार करू असा निरोप आल्याने आपली स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला कार्यकर्त्यांनी फक्त सत्रच्या उचलायच्या का अशी भावना तीव्र असताना आपली मात्र कार्यकर्त्यांना संधी दिली आहे .                                    लोकसभा विधानसभेला आम्ही आघाडीचे काम प्रामाणिकपणे केले महापालिका निवडणूक मध्ये इंडिया गाडी म्हणून लढू या असा प्रस्ताव सुद्धा काँग्रेसने दिला होता. परंतु मित्र पक्षांना फक्त गरजेपुरते वापरा आणि परतफेड करायची वेळ आली की, निवडणुकीत च्या निष्कर्षामध्ये तुम्ही बसत नाही ,असे म्हणत फेकून द्यायचे असे धोरण काँग्रेस वापरत असल्याची घनाघाती टीका आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली .                                                     आम आदमी पार्टी महापालिकेच्या सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली .प्रामाणिक काम करणारी विविध पक्षातील इच्छुक कार्यकर्ते डॉक्टर इंजिनिअर यासारखे कोल्हापूरची भविष्य घडविण्यात ची मानसिकता ठेवणारी सुशिक्षित नागरिक तसेच सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या महिलांनी पक्षाला संपर्क करावा आम्ही त्यांना उमेदवारी देऊ असे आवाहन करण्यात आले त्याचबरोबर विकासाचा अजेंडा घेऊन पुढे येणाऱ्या समविचारी पक्षांची देखील युती होण्याची शक्यता यावेळी संदीप देसाई यांनी व्यक्त केली .                                 
   यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, महासचिव अभिजीत कांबळे ,सुरज सुर्वे, मोईन मोकाशी, दुष्यंत माने ,उषा वडर, विजय हेगडे, प्रसाद सुतार ,अनिल जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक कोल्हापूर : …