Home राजकीय लव जिहाद प्रकरणी कारवाईसाठी हिंदुत्ववादी संघटनेचे ठिय्या आंदोलन

लव जिहाद प्रकरणी कारवाईसाठी हिंदुत्ववादी संघटनेचे ठिय्या आंदोलन

0 second read
0
0
66

no images were found

लव जिहाद प्रकरणी कारवाईसाठी हिंदुत्ववादी संघटनेचे ठिय्या आंदोलन

कोल्हापूर : येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी काही दिवसांपासून बेपत्ता आहे. मात्र तिला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनेने केला असून हा लवजिहादचा प्रकार असल्याचीही शक्यता या संघटनांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने आंदोलन येथील जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडून बसले आहेत. शिवाय या घटनेचा तात्काळ तपास करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. या आंदोलनात महिला सुद्धा सहभागी झाल्या असून अनेकांच्या हातात उत्तर प्रदेश प्रमाणे योगी पॅटर्न पाहिजे असे फलक सुद्धा झळकत आहेत.दरम्यान,
लव जिहाद वरुन जिल्ह्यातील प्रकरण राजकारणाने तापत असतानाच,अल्पवयीन मुलींना पळवून नेणाऱ्या प्रवृत्तीवर कारवाई करण्याची मागणी आता मुस्लिम बोर्डिंग कडून करण्यात आली आहे.
जिल्ह्यातून अल्पवयीन मुलींना प्रेमप्रकरणामध्ये अडकवून पळवून नेण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या चार महिन्यापासून ग्रामीण भागातील करवीर तालुक्यातील केर्ली येथील मुलगी बेपत्ता आहे.पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चकरा मारून वैतागलेल्या आई वडिलांना अद्याप त्या मुलीचा ताबा मिळाला नाही .पोलीस थातुरमातुर उत्तरे देऊन तिच्या आई – वडिलांना पोलिस ठाण्यातून हाकलून लावत असल्याची माहिती आहे.त्याचबरोबर आणखी एक १४ वर्षांची मुलगी अशाच फसवीगिरीमुळे बेपत्ता आहे.
अशा प्रकरणांमध्ये पोलीस खाते, गृहखाते, काय करते हा संशोधनाचा विषय आहे.अशा आरोपींना व त्यांना मदत करणा-यांनाही,अशा प्रेमी युगुलाना निवारा देणाऱ्या,घर असो वा लॉजिंग असो या सर्वांवर तपासणी करून,पोक्सो कायद्याखाली कारवाई होणे आवश्यक आहे.तसेच अल्पवयीन मुलींना पळवून नेणाऱ्या तरुणांवर जुजबी कारवाई न करता पोक्सो कायद्याखाली सर्वांना अटक होणे आवश्यक आहे.
अल्पवयीन मुलींच्या बाबतीत ज्या घटना घडत आहेत त्याकरता पन्हाळा रोडवर लॉजिंग व इतर ठिकाणी पोलिसांनी कारवाई सुरू केली तर निश्चितपणे यावर आळा बसेल,अशा कुठल्याही अल्पवयीन मुलींच्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी कडक कारवाई करावी असे आवाहन मुस्लिम बोर्डिंग चे चेअरमन गणी आजरेकर,प्रशासक कादर मलबारी,रफिक शेख,रफिक मुल्ला,मलिक बागवान,लीयाकत मुजावर,जहांगीर आतार यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.जिल्ह्यात लव जिहाद वरुन वातावरण पेटले आहे .हिंदु मुलींना पळवून नेल्याचे चित्र दिसत आहे. आता तर गेल्या तीन महिन्यांपासून तुमचेच गृहमंत्री असताना,या मुली सापडत का नाहीत असा सवालही यानिमित्ताने जनतेकडून करण्यात येऊ लागला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…