
no images were found
खासदार राजन विचारे यांचा आरोप; महाराष्ट्र पोलिसांना पत्र
संरक्षणात कपात करण्यात आल्याने नाराज असलेले ठाकरे गटाचे ठाण्याचे खासदार विचारे यांनी आपल्या जिवाला काही झाल्यास त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असतील, असा आरोप केला आहे. दरम्यान महाराष्ट्र पोलिसांना पत्र देऊन त्यांनी कपात करण्यात आलेल्या सुरक्षेची पुन्हा मागणी केली आहे. मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी आपल्याला रात्री-अपरात्री फिरावे लागते. अशास्थितीत एखादी दुदैवी घटना घडू शकते असेही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
राजन विचारे यांनी आपल्या जीवाला धोका आहे. आपली पोलीस सुरक्षा कमी करण्यात आली असून जीवाचं काही बरं वाईट झाल्यास त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील, असेही विचारे यांना या पत्रात म्हटले आहे.