
no images were found
सिंजेंटा इंडिया तर्फे जैविक तंत्रज्ञानाद्वारे शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी कृती आराखडा सादर
पुणे, :सिंजेंटा इंडिया तर्फे नुकत्याच पार पडलेल्या बायोएजी वर्ल्ड काँग्रेसमध्ये विज्ञान आधारित नाविन्यपूर्ण वापराद्वारे शेतकऱ्यांना समग्रपणे सक्षम करण्यासाठी आपला कृती आराखडा सादर करण्यात आला.
सिंजेंटा इंडिया प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक सुशील कुमार म्हणाले की, शेती करताना अनेकविध आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच पिकांची लागवड व्यवहार्य व शाश्वत पध्दतीने व्हावी याची खात्री करण्यासाठी आपल्याला बहुआयामी धोरण अवलंबण्याची गरज आहे. मातीचे आरोग्य सुधारणे,पिकांची प्रतिकार शक्ती आणि शेतकऱ्यांना सर्वांगीण उपाय प्रदान करणे या उद्देशाने जैविक उत्पादने हे आमच्या सर्वोत्तम पध्दतींच्या केंद्रस्थानी आहे.