
no images were found
अन्यथा भाजपाने कोल्हापूर निवडणुकीत उमेदवार दिला नसता – सुषमा अंधारे
मुंबई : मुंबईतील अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झालाय. यानंतर, ‘भाजपाचा आणि संवेदनशीलतेचा काहीही संबंध नसून पराभवाच्या भितीनेच त्यांनी माघार घेतली’, असे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडलंय.
भाजपाला जर संवेदनशिल राजकारण आणि संस्कृती कशी जपायची हे माहिती असतं तर कोल्हापूर निवडणुकीत त्यांनी उमेवार दिला नसता, अशी अंधारे यांनी टीका केलीय. भाजपला समोर पराभव दिसत होता म्हणून भाजपाने माघार घेतलीय. सर्व एजन्सीने भाजपा पराभूत होईल असे सांगितले होते. त्यामुळे भाजपाकडून लावण्यात आलेला हा मुलामा आहे, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.