Home मनोरंजन ‘बस इतना सा ख्वाब’ सोबत 15 वर्षांनंतर झी टीव्ही वर पुनरागमन करणार राजश्री ठाकूर

‘बस इतना सा ख्वाब’ सोबत 15 वर्षांनंतर झी टीव्ही वर पुनरागमन करणार राजश्री ठाकूर

19 second read
0
0
23

no images were found

बस इतना सा ख्वाब’ सोबत 15 वर्षांनंतर झी टीव्ही वर पुनरागमन करणार राजश्री ठाकूर

अनेक घरांमध्ये गृहिणी देत असलेल्या योगदानाकडे कोणाचे फारसे लक्ष जात नाही – बचत करणेव्यवस्थापन करणे आणि काळजी घेणे ह्या गोष्टींमधील तिचे दैनंदिन प्रयत्न अगदी शांतपणे कुटुंबाच्या रूटिनमध्ये अशाप्रकारे मिसळून जाते की त्याचे मूल्य कोणाला जाणवतच नाही. जेवढे महत्त्व घरामध्ये कमाई करणाऱ्या व्यक्तीला मिळते तेवढे गृहिणीला मिळत नाही. ह्याच संकल्पनेवर झी टीव्हीवरील नवीन मालिका बस इतना सा ख्वाब ही कानपुरची एक गृहिणी अवनी त्रिवेदीच्या प्रवासावर प्रकाश टाकते. आपल्या परिवारासाठी अवनी सातत्याने छोटे मोठे त्याग करत असते आणि अथकपणे आपल्या परिवारासाठी ती समर्पित आहे. रूपयारूपयाच बचत करूनएकट्‌याने कामे पूर्ण करून ती आपल्या परिवाराच्या आपले असे मोठे घर घेण्याच्या स्वप्नामध्ये आपल्या वतीने योगदान देते. पण तिने काहीही केले तरी तिचे हे समर्पण कायमच गृहित धरले जाते. लोकांच्या हे लक्षात येत नाही गृहिणीला तिचे काम करण्यासाठी पगार मिळत नाही पण आपल्या परिवारासाठी आपल्या कामातून ती ज्या मूल्याची भर टाकते ते अमूल्य आहे.

ह्या मालिकेबद्दल रोमांचक गोष्ट ही आहे की लोकप्रिय आणि गुणी अभिनेत्री राजश्री ठाकूर ह्या मालिकेत अवनीची भूमिका साकारत असून ती तब्बल 15 वर्षांनंतर झी टीव्हीवर पुनरागमन करत आहे. ती एका 42 वर्षीय गृहिणीची भूमिका साकारत असून ती कानपुरची आहे. आपल्या परिवारासोबत असलेले तिचे नाते हेच तिच्या व्यक्तिमत्त्वाची व्याख्या करते. तिचे अख्खे जग तिचे घर आणि तिच्या परिवाराभोवती फिरते. तिचा निस्वार्थी असण्यामध्ये विश्वास असून तेव्हाच प्रश्न उद्‌भवतो – काय आपल्या परिवाराचे स्वप्न पूर्ण करण्यामध्ये योगदान देण्याच्या तिच्या नवीन प्रयत्नामध्ये काय तिला तिच्या जवळच्या व्यक्तींचे समर्थन मिळेल?

राजश्री ठाकूर म्हणाली15 वर्षांनंतर पुन्हा एकदा झी टीव्हीवर परत येताना मी अतिशय उत्साहात आहे. हे जणू माझ्यासाठी एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखे आहे. आणखी उत्साहाची बाब म्हणजे मला अवनीसारखी प्रेरणादायी व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळत आहे. ती कानपुरची एक 42 वर्षीय गृहिणी असून तिचे अख्खे जग तिच्या परिवार आणि घराभोवती एकवटलेले आहे. अवनीबद्दल मला एक गोष्ट आवडते आणि ती म्हणजे तिचा निस्वार्थीपणा. तिचे ज्या लोकांवर प्रेम आहे त्यांच्यासाठी ती सर्वकाही देते आणि त्याबदल्यात तिची काहीही अपेक्षा नाही. ही व्यक्तिरेखा मला आपलीशी वाटली आणि तिच्या प्रेमत्याग आणि शांत शक्तीच्या प्रवासाचा अनुभव प्रेक्षकांनी घ्यावा यासाठी मी उत्सुक आहे. ह्या मालिकेच्या माध्यमातून आम्ही काहीतरी अतिशय सुंदर सांगण्याचा प्रयत्न करत आहोत – ‘जो घर संभाल सकती हैवो घर चला भी सकती है. तिची व्यक्तिरेखा पडद्यावर जीवंत करण्यासाठी मी उत्सुक आहे.

अवनीच्या कथेच्या माध्यमातून बस इतना सा ख्वाब’ एक शक्तीशाली संदेश देतेः की घराच्या चार भिंतींमध्ये अतिशय सहजपणे शेकडो जबाबदाऱ्या पूर्ण करत असलेल्या गृहिणी निःशंकपणे बाहेरच्या कठोर जगातही पाऊल ठेवून आपल्या घरासाठी कमवू शकतात. जो घर संभाल सकती हैवो घर चला भी सकती है.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…