Home राजकीय पाटील-महाडिक गट एकमेकांना भिडले

पाटील-महाडिक गट एकमेकांना भिडले

1 second read
0
0
80

no images were found

पाटील-महाडिक गट एकमेकांना भिडले

कोल्हापूर : महाडिक आणि पाटील यांच्यातील राजकीय वाद आणि आरोप -प्रत्यारोपामुळे लक्ष लागून राहिलेल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सत्ताधारी आघाडी व विरोधी आघाडी यांच्यात प्रचंड घोषणाबाजी झाली. दोन्ही गट परस्परांना भिडले.   एक तासभर चाललेल्या सभेत सभासदांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषयाला हात उंचावत आणि मंजूर मंजूर अशा घोषणा देत बहुमताने  मान्यता दिली.

कारखान्याचे संचालक अमल महाडिक यांनी राजाराम कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी जिल्हा बँकेकडून 129 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. त्या माध्यमातून कारखान्याचे विस्तारीकरण, सहवीज प्रकल्प व इथेनॉल निर्मिती प्रकल्पाची उभारणी होईल.सहवीज प्रकल्प 2024 मध्ये कार्यान्वित होईल अशी घोषणाही महाडिक यांनी केली. राजाराम कारखान्याचे कामकाज क्वाॅलिटी, क्वाॅटिंटी आणि कमिटमेंट या तीन सुत्रानुसार होईल. असे अमल महाडिक यांनी जाहीर करतात सभासदांनी मंजूर मंजूर अशा घोषणा देत टाळ्यांचा गजर केला.दरम्यान सभेसाठी दोन्ही गटांनी प्रचंड ताकद लावली होती. सभेच्या प्रारंभपासून दोन्ही गटाने घोषणाबाजी करत शक्तिप्रदर्शन घडविले. विरोधी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने समांतर सभा घेत सत्ताधारी आघाडीने सभासदांचा आवाज दाबल्याचा आरोप केला.

कारखान्याचे संचालक अमल महाडिक व काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्यातील आरोप, प्रत्यारोप यामुळे  सभेकडे साऱ्यांच्या लक्ष होते. दुसरीकडे सभेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात केला होता. सभेची नियोजित वेळ सकाळी अकराची होती. सत्ताधारी आघाडीच्या सभासदांनी सकाळपासूनच कारखाना परिसरात गर्दी केली. सभास्थळी उपस्थित सभासदाकडून महाडिक साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या जात होत्या. सभेला सुरुवात होण्याअगोदर अर्धा तास विरोधी सभासद सभास्थळी आले. व्यासपीठाच्या समोरील बाजूस सत्ताधारी समर्थकांनी जागा व्यापली होती त्यामुळे बसायला जागा न मिळालेल्या विरोधकांनी,  सभेला सत्ताधारी आघाडीवर बोगस सभासद आणल्याचा आरोप केला. घोषणेबाजी ही केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून सत्ताधारी आघाडीच्या  समर्थकांनी घोषणा दिल्या. त्यामुळे काही वेळ तणावाची स्थथिती निर्माण झाली.

बरोबर अकरा वाजता माजी आमदार महादेवराव महाडिक, चेअरमन दिलीप पाटील, व्हाईस चेअरमन वसंत बेनाडे, संचालक अमल महाडिक, आदी व्यासपीठावर दाखल झाले. सभेच्या प्रारंभी गेल्या वर्षभरात मृत्युमुखी पडलेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

राजाराम कारखाना सभासदांच्या मालकीचा आहे. भविष्यातही तो सभासदांच्या मालकीचा राहील. कसबा बावडासहित 122 गावातील सभासद हे कारखान्याचे खरे मालक आहेत. अशा शब्दात अमल महाडिक यांनी नाव न येता आमदार सतेज पाटील यांच्यावर तोफ डागली. कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी 129 कोटी रुपयाचे कर्ज केडीसी बँकेकडून मंजूर झाले आहे. त्या माध्यमातून कारखान्याच्या विस्तारीकरणासह सहवीज प्रकल्प आणि इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारला जाईल. सभासदांना दिवाळी बोनस म्हणून एक किलो साखर व दिवाळीला तीन किलो साखर दिले जाईल.

कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांनी सभेपुढील विषयांचे वाचन केले. सोळाव्या प्रश्नाचे वाचन सुरू असताना विरोधी आघाडीचे समर्थक डाव्या बाजूस येऊन घोषणा देण्यास सुरुवात केली. तसेच प्रश्न विचारू लागले. त्याला उत्तर म्हणून सत्ताधारी समर्थक जोरदार घोषणा देऊ लागले या घोषणाबाजीतच सर्व प्रश्नांचे वाचन पूर्ण झाले. दरम्यान विरोधी आघाडीच्या समर्थकांनी आमदार सतेज पाटील यांचा फोटो  असलेलाा फलक उंचावत घोषणा दिल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून सत्ताधारी समर्थकांनी अमल महाडिक याांना खाांद्यावर उचलून घेतले. दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाली. राजाराम कारखान्याची सभा तासभर झाल्यानंतर वंदे मातरम सांगता झाली. यानंतर विरोधी समर्थकांनी कारखाना प्रवेशद्वाराच्या परिसरात समांतर सभा घेतली. मोहन सालपे, अशोक भ.पवार, बाजीराव पाटील यांची भाषणे झाली. सत्ताधाऱ्यांनी सभासदांना प्रश्न विचारू दिले नाहीत. सभासदांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. कारखान्यासाठी आमचा लढा सुरूच राहील असे त्यांनी भाषणात सांगितले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…