Home राजकीय श्वेतपत्रिकेतील आदर्श उल्लेखानंतर राजकीय भूकंप!

श्वेतपत्रिकेतील आदर्श उल्लेखानंतर राजकीय भूकंप!

0 second read
0
0
23

no images were found

श्वेतपत्रिकेतील आदर्श उल्लेखानंतर राजकीय भूकंप!

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केद्रातील तत्कालीन काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातील आर्थिक स्थितीचा आढावा घेणारी श्वेतपत्रिका लोकसभेत सादर केली आणि तीन दिवसात महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. श्वेतपत्रिकेतील आदर्श घोटाळ्याचा उल्लेख असणे आणि त्यानंंतर काँग्रेसचे अत्यंत निष्ठावान व राज्यातील वजनदार नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा देणे, हा योगायोग की भाजपच्या दबावतंत्राच्या राजकारणाची खेळी, अशी चर्चा सुरु झाली आहे.
सहा महिन्यांपूर्वी असाच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून २०२३ मध्ये प्रदेशात भोपाळ येथील जाहीर सभेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचारी पक्ष असल्याचा आरोप केला आणि महाराष्ट्रातील सिंचन गैरव्यवहाराचा उल्लेख केला. त्यानंतर काही दिवसांतच म्हणजे २ जुलै रोजी अजित पवार ४० आमदारांना घेऊन राष्ट्रवादीतून बाहेर पडले आणि भाजपप्रणित राज्य सरकारमध्ये सामील झाले. ही महाराष्ट्रातील भाजपविरोधी महाविकास आघाडी खिळखिळी करण्याची पूर्वनियोजित राजकीय खेळी असल्याचे मानले जाते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण &…