Home मनोरंजन घराला पूर्णत्व देणाऱ्या बाईची हृदयस्पर्शी कथा ‘बाई तुझा आशीर्वाद’

घराला पूर्णत्व देणाऱ्या बाईची हृदयस्पर्शी कथा ‘बाई तुझा आशीर्वाद’

0 second read
0
0
6

no images were found

घराला पूर्णत्व देणाऱ्या बाईची हृदयस्पर्शी कथा ‘बाई तुझा आशीर्वाद’

मराठी मालिका विश्वात नेहमीच समाजाशी निगडित आणि विचार करायला लावणारे विषय मांडणारी स्टार प्रवाह वाहिनी ‘बाई तुझा आशीर्वाद’ या मालिकेच्या निमित्ताने नवा विषय प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. घर चालवणारी, जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणारी, नात्यांमध्ये समतोल साधणारी, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी झगडणारी आणि घराला पूर्णत्व देणारी स्त्री म्हणजेच ‘बाई’ या मालिकेच्या केंद्रस्थानी आहे. ज्या घराला बाईच्या असण्याचीच सवय नाही, अशा पूर्णपणे पुरुषप्रधान घरात अवनीचं आगमन होतं… आणि तिथूनच सुरू होतो नात्यांचा नवा प्रवास. तिच्या येण्याने त्या घरात फक्त एक व्यक्ती नाही, तर समज, संवाद, आपुलकी आणि घरपण येतं. ‘बाई तुझा आशीर्वाद’ ही मालिका ठामपणे सांगते की बाई म्हणजे केवळ घर चालवणारी व्यक्ती नाही, तर ती घराला घर बनवणारी शक्ती आहे.

स्टार प्रवाहच्या या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टविषयी सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘घराला घरपण एका बाईमुळे येतं. ती खऱ्या अर्थाने घराचं नंदनवन करते. तिचं अस्तित्व हा तिचा आशीर्वाद असतो. अश्या बाईच्या आशीर्वादाला मुकलेल्या घराला, कुटुंबाला पुन्हा एक बाई कशी जोडते याची गोष्ट मांडण्याचा प्रयत्न या मालिकेतून करणार आहोत. मला खात्री आहे ही मालिका प्रेक्षकांना नक्की आवडेल.’

सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे आणि सुनील तावडे यांच्यासह अक्षता अनिता प्रमोद, अर्णव वॅरिअर, पुष्कर सराड, सतीश तांदळे, राघव वर्तक असे अनेक नवोदित कलाकार या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती निखिल शेठ आणि विनोद लव्हेकर यांच्या पोतडी या निर्मिती संस्थेने केली असून विनोद लव्हेकरच या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. अमोल पाटील या मालिकेच्या लेखनाची जबाबदारी पार पाडणार आहेत.

स्टार प्रवाहच्या आशयसमृद्ध परंपरेला नवी उंची देणारी बाई तुझा आशीर्वाद मालिका नक्की पहा ३० मार्चपासून रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

शिवाजी विद्यापीठात १३ व १४ मार्च रोजी राज्यशास्त्र परिषदेचे ३१ वे अधिवेशन आणि राष्ट्रीय चर्चासत्र :’राज्यशास्त्रातील नवीन प्रवाह’ यावर होणार विचार मंथन

शिवाजी विद्यापीठात १३ व १४ मार्च रोजी राज्यशास्त्र परिषदेचे ३१ वे अधिवेशन आणि राष्ट्रीय चर…