
no images were found
राज्यातील साखर कारखान्यांना एकरकमी एफआरपी देणे अशक्य नसल्याचे कारण देत. एफआरपीचे तुकडे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
कोल्हापूर : राज्यातील साखर कारखान्यांना एकरकमी एफआरपी देणे अशक्य नसल्याचे कारण देत. एफआरपीचे तुकडे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यानंतर राज्यातील अनेक शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत विरोध केला. याबाबत जनजागृती करत माजी खासदार राजू शेट्टी यांनी एफआरपीचे तुकडे केल्यास आंदोलनाचा इशारा दिला. कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकीत मानला जाणाऱ्या पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या 66 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांना एक रक्कमी एफआरपी देण्याचा ठराव करावा अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सागर शंभुशेटे यांच्या नेतृत्वाखाली मांडण्यात आली. यावेळी सर्व शेतकरी सभासद यांनी एकजूट दाखवत संचालक मंडळास हा ठराव मंजूर करण्यास भाग पाडले. या ठरावास कारखान्याच्या संचालक मंडळाने मंजूर करून शासनानेही एकरकमी एफआरपी देण्याचा शासन निर्णय करण्याचा ठराव या सभेत करण्यात आला.
शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी द्या असा वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव करणारा देशभक्त रत्नाप्पाणा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना राज्यातील पहिला साखर कारखाना ठरला आहे. झालेल्या वार्षीक सभेत शेतकऱ्यांनी मांडलेले गणित पाहून कारखान्याला एकरकमी एफआरपी देण्यास भाग पाडत ठराव मंजूर करून घेतला.
एफआरपीबाबत राज्य सरकारने दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला असून उसाचे गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असताना एफआरपीचे दोन तुकडे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता आहे. दरम्यान यावर शरद पवार यांनी हा निर्णय योग्य असल्याचे सांगितले.