Home धार्मिक दगडातील मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा का असते आवश्यक?

दगडातील मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा का असते आवश्यक?

0 second read
0
0
32

no images were found

दगडातील मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा का असते आवश्यक?
दीर्घ प्रतिक्षेनंतर २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले. मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. १६ जानेवारीपासून अयोध्येत प्राणप्रतिष्ठा पूजा सुरू झाली होती. पण, प्राणप्रतिष्ठा का केली जाते? मूर्तीतमध्ये देवाचे अस्तित्व आणणारी ही पूजा काय असते, हेच जाणून घ्या.
हिंदू धर्मानुसार कोणत्याही मंदिरात देवी-देवतांची मूर्ती स्थापन करण्याआधी त्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करणे आवश्यक असते. प्राणप्रतिष्ठेचा अर्थ आहे की मूर्तीमध्ये प्राण आणणे. जिवंत शक्ती आणणे. तोपर्यंत मूर्ती देव नसते. देवाचे प्राण त्यात आणण्यासाठी प्राणप्रतिष्ठा करावीच लागते . प्राणप्रतिष्ठे दरम्यान अनेक टप्पे असतात, ज्याला अधिवास म्हणतात. अधिवास ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये मूर्तीचे विविध गोष्टींमध्ये बुडवली जाते. या प्रक्रियेअंतर्गत मूर्ती प्रथम पाण्यात ठेवली जाते. त्यानंतर मूर्ती धान्यात ठेवली जाते. यानंतर ही मूर्ती फळांमध्ये ठेवली जाते आणि नंतर औषध, केशर आणि नंतर तूपात ठेवली जाते.
या प्रक्रियेनंतर मूर्तीला विधीपूर्वक आंघोळ घालण्यात येते. यादरम्यान मूर्तीला विविध साहित्याने आंघोळ करून अभिषेक केला जातो. स्नानानंतर विविध मंत्रांचा उच्चार करून देवाला जागृत केले जाते. त्यानंतर प्राणप्रतिष्ठेची पूजा सुरू होते. यानंतर सर्व पूजाविधी पार पाडल्या जातात. या वेळी परमेश्वराला नवीन वस्त्रे परिधान करून सजविले जाते. अभिषेक झाल्यानंतर मूर्तीला आरसा दाखवला जातो. असे मानले जाते की देवाचे डोळे इतके तेजस्वी असतात की, केवळ देव स्वतःच त्याचे तेज सहन करू शकतो. शेवटी आरती झाल्यानंतर लोकांमध्ये प्रसादाचे वाटप केले जाते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …