
no images were found
भाजप म्हणजे इंडिया नाही. प्रत्येक व्यक्ती हा इंडिया आहे”: संजय राऊत
मोदी म्हणजे इंडिया नाही.भाजप म्हणजे इंडिया नाही. हे नागरिक म्हणजे इंडिया आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
देशातील विरोधी पक्षांची काल संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत २६ पक्षांच्या आघाडीला नाव देण्यात आले. INDIA असं हे नाव असून Indian National Development Inclusive Alliance असा त्याचा पूर्ण अर्थ होतो.
मात्र, यावरून भाजपाने टीका केली जात आहे. हा भारताचा अपमान असल्याचं म्हटलं जातंय. यावरून संजय राऊतांनी भाजपावर टीकास्र सोडलं आहे.
फक्त मोदींनाच वोट फॉर इंडिया बोलण्याचा अधिकार नाही. मोदी इज इंडिया, हा इंडियाचा अपमान नाही का? वारंवार मोदींनी आपल्या भाषणात आम्ही म्हणजे इंडिया आहोत असं म्हटलंय, याचा अर्थ काय होतो? मोदी म्हणजे इंडिया नाही.भाजप म्हणजे इंडिया नाही. प्रत्येक व्यक्ती हा इंडिया आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
भ्रष्टाचारी लोकांची ही आघाडी असल्याची टीकाही भाजपाकडून करण्यात आली आहे. यावरून संजय राऊत म्हणाले की, “७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा तुमच्या बाजूला उभा आहे. पाठिमागे इक्बाल मिरची उभा आहे. हे ढोंग बंद करा. हे ढोंग लोकांना कळतंय.
आम्ही २६ पक्ष एकत्र आल्यावर तुमच्या एनडीएचं कमळ फुलायला लागलं. आम्ही भारत म्हणून, देश म्हणून एकत्र आल्यावर तुम्हाला एनडीए आठवली.
हा इंडिया तुमच्या हुकूमशाहीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. भारत जिंकणार, इंडिया जिंकणार आणि हुकूमशाहीचा पराभव होणार. हिंमत असेल तर भारताचा पराभव करून दाखवा.” असं संजय राऊत म्हणाले.