पं.नेहरूंच्या दूरदृष्टीमुळे देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण : डॉ.संजय कुबल
कोल्हापूर : भारत देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर पं.नेहरू यांनी राबविलेल्या पंचवार्षिक योजने मुळे देश अन्न धान्यात स्वयं पूर्ण झाला त्याला पं.नेहरूंची दूरदृष्टी कारणीभूत असल्याचे प्रतिपादन दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे उपकुलसचिव डॉ.संजय कुबल यांनी केले.
शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या राज्यशास्त्र विषया अंतर्गत ‘महाराष्ट्राची संकल्पना आणि लघु संशोधन प्रबंध सुलभ लेखन पद्धती’ या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळेच्या “महाराष्ट्राच्या संकल्पनेतील कृषी उद्योगाचे प्रारूप” या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे होते, यावेळी उपकुलसचिव डॉ.संजय कुबल,उपकुलसचिव श्री.सी.एस.कोतमिरे यासह विद्यार्थी, समन्वयक, सहा.प्राध्यापक प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी व सेवक उपस्थित होते.
डॉ.कुबल म्हणाले की,भारत हा देश औद्योगिक क्रांती पूर्वीचा भारत कृषी प्रधान होता,त्यावेळी संपूर्ण जग भारत देशावर अवलंबून होते,मात्र परकीय आक्रमणामुळे भारतीय शेतीवर दूरगामी परिणाम झाला.यासाठी ब्रिटीशांचे धोरण कारणीभूत होते.ब्रिटिशानी भारतासाठी कच्च्या मालाचा उत्पादक पक्क्या मालासाठी बाजारपेठ अशी कार्यप्रणाली वापरली.आणि राज्यकारभार केला.ब्रिटिशानी नफा आपल्या देशात घेऊन गेले व राज्यव्यवस्था खर्च भारतीय अर्थ व्यवस्थेवर टाकला त्यामुळे शेतीचा ऱ्हास होण्याबरोबर शेती प्रधान देश विरोधी दिशेला गेला आणि यातून श्रीमंत शेतीचे प्रमाण कमी कमी होत गेले.
स्वातंत्र्या नंतर औद्योगिकीकरण व शेती विकास सुद्धा समान रेषेत विकास झाला नाही. कारण औद्योगिकीकरणाला अवाजवी महत्व दिले. त्यातून बेरोजगारी निर्माण झाली.कृषी धोरण हे भरभक्कम उभे पाहिजे होते. प्रथम शेती, द्वितीय कारखानदारी आणि तृतीय सेवा क्षेत्र अशा पद्धतीने विकासाची वाढ केली असता कृषी धोरण वेगळे दिसले असते.शेतीचा विकास करणे साठी विविध विचारवंतानी कृषी विषयक विचार माडलेले आहेत.म.फुले यांनी व्यापारी शेती करण्यास विरोध केलेला होता .शेती कडे पाहण्यात येणारा धार्मिक,सरकार,नोकरशाही दृष्टीकोनच शेतकऱ्यांसाठी पिळवणूक ठरला,यातून शेतीचा विकास खुटला,असे डॉ.कुबल म्हणाले.
यावेळी प्रास्ताविक व स्वागत डॉ.सुशांत माने यांनी केले, सूत्रसंचालन डॉ.सचिन भोसले यांनी केली व आभार डॉ.बबन पाटोळे यांनी केले.