Home धार्मिक   विशाळगडावरील सर्व अतिक्रमण काढणारच : जिल्हाधिकारी रेखावार

  विशाळगडावरील सर्व अतिक्रमण काढणारच : जिल्हाधिकारी रेखावार

6 second read
0
0
51

no images were found

  विशाळगडावरील सर्व अतिक्रमण काढणारच : जिल्हाधिकारी रेखावार

कोल्हापूर : सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून विशाळगडावरील सर्व अतिक्रमण काढली जातील. शुक्रवारी अतिक्रमण काढण्यासाठी निविदा प्रसिद्ध होणार आहेत. यामुळे कारसेवेचे आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन यांनी केले.त्यामुळे महाशिवरात्रीनंतर होणारे कारसेवेचे आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याचे हिंदुत्ववादी संघटना आणि शिवभक्तांनी जाहीर केले. विशाळगडावर पशुहत्या करण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. त्यावर निर्णय घेतला जाईल, असेही रेखावार यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत महाशिवरात्रीपर्यंत विशाळगडावरील अतिक्रमण हटवा, असा अल्टिमेटम हिंदुत्ववादी संघटनांनी प्रशासनाला दिला होता. महाशिवरात्रीनंतर कारसेवा करत अतिक्रमण हटवण्याबाबतचे संदेश सोशल मीडियातून व्हायरल होते. त्यातून विविध ग्रुप तयार होऊन सुमारे 844 जणांनी कारसेवेसाठी नोंदणीही केली होती. कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभर याचे पडसाद उमटण्याची भीती होती. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने तातडीने सर्व संघटना, अतिक्रमणधारकांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बोलवली होती. . या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांचे नेते यांच्यासोबत जिल्हाधिकारी रेखावार आणि पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी बैठक घेऊन चर्चा केली.

जे अतिक्रमण सहजपणे काढणे शक्य आहे, ते महाशिवरात्रीपासून काढण्यास सुरू करा. त्यामुळे कारसेवा करण्याची गरज भासणार नाही, असे शिवसेनेचे विजय देवणे म्हणाले. गडावर कर्नाटकातून दररोज रात्री मुक्कामाला येणार्‍या बसेसमधून होणार्‍या कोंबड्यांच्या वाहतुकीवर कारवाईची मागणी हर्षल सुर्वे यांनी केली. अतिक्रमणाला जातीय रंग देऊ नका. गडावर पशुहत्या केली जाऊ नये, गडाचे पावित्र्य जपा, असे आवाहन बंडा साळोखे यांनी केले.

राज्य संरक्षित स्मारकांवर पशुहत्येला बंदी असल्याचे पत्र जिल्हा प्रशासनाला पाठवले आहे. त्याची अंमलबजावणी करत विशाळगडावर पशूुत्येला कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी केली. किशोर घाटगे यांनी त्याला दुजोरा दिला.

ही सर्व जमीन संस्थानकालीन आहे. कुठेही खासगी जमीन नाही. अतिक्रमण काढण्याची मुदत जाहीर करा, अशी मागणी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी केली. हा सर्व परिसर इको सेन्सेटिव्ह झोन असल्याने रात्रीचा प्रवास बंद करा, असे राम यादव म्हणाले तर गडावरील राहत्या घरांना संरक्षण द्या, आम्हाला राहण्यासाठी जागा नाही, कागदपत्राची तपासणी करून त्यानंतरच निर्णय घ्या, अशी मागणी अतिक्रमणधारकांनी केली.

  उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी न्यायालयातील स्थगिती उद्या उठली तर रविवारपर्यंत अतिक्रमण दिसणार नाही, असे ठामपणे सांगितले. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जिल्ह्यात 19 रोजी अतिमहत्त्वाच्या व्यक्ती दौर्‍यावर येत आहेत. यामुळे तातडीने अतिक्रमण काढणे शक्य नाही. त्यासाठी प्रशासनाची प्रक्रिया गतीने आणि कायदेशीर मार्गाने पुढे जात आहे. यामुळे अतिक्रमण काढले जाणारच आहे. कारसेवेबाबत व्हायरल होत असलेल्या संदेशामुळे बाहेरून येऊन महाशिवरात्री तसेच त्यानंतरही गालबोट लावले जाऊ शकते. यामुळे हे आंदोलन स्थगित करा, असे सांगितले.

यावेळी पन्हाळा-शाहूवाडीचे प्रांताधिकारी अमित माळी, शाहूवाडीचे तहसीलदार गुरू बिराजदार, भूमिअभिलेखचे जिल्हा अधिक्षक सुदाम जाधव, पुरातत्व विभागाचे विलास वाहणे, तहसीलदार सुनिता नेर्लीकर,शिवसेनेचे रविकिरण इंगवले, कमलाकर जगदाळे, पंडीत पोवार, शिवानंद माळी, मधुकर नाझरे, अवधूत काटे, जी.जी.जोशी, पांडूरंग वेल्हाळ, कुंदन पाटील, प्रमोद सावंत आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…