
no images were found
द कपिल शर्मा शो मध्ये स्टार शेफ गरिमा अरोरा ने सांगितले महिला शेफची आव्हाने
चांगले अन्न म्हणजे जणू ताटात वाढलेली कविताच आणि शेफ म्हणजे कवी! सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील द कपिल शर्मा शोचा या वीकएंडचा भाग हा खाद्यपदार्थ, शेफ्स आणि खवय्ये यांना समर्पित आहे. या भागात देशातील अव्वल दर्जाचे शेफ रणवीर ब्रार, गरिमा अरोरा आणि विकास खन्ना हजर असतील, जे सध्या मास्टरशेफ इंडिया या रियालिटी शोमध्ये परीक्षणाचे काम करत आहेत.तर मग, तयार व्हा, अमर्याद हास्य-मेजवानीसाठी! आमंत्रित पाहुणे मास्टरशेफ इंडिया, त्यांची कारकीर्द आणि खाण्याविषयी मनमोकळ्या गप्पा मारताना दिसतील, तर कपिल आणि त्याचा अतरंगी परिवार ह्या पाहुण्यांना हसवण्यासाठी सर्व प्रयत्न करेल.
गप्पांच्या ओघात अर्चना पूरण सिंह शेफ गरिमा अरोराला विचारेल की, या पुरुष प्रधान क्षेत्रात एक महिला शेफ असल्यामुळे कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागते? त्यावर गरिमाने उत्तर दिले, “सुदैवाने माझ्या आसपास असलेले पुरुष नेहमीच खूप चांगले होते. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी मला चांगली सोबत केली आणि सांभाळूनही घेतले. पण हो, हा मुळातच एक आव्हानात्मक व्यवसाय आहे. तरीही,एकदा तुमच्या मनाने निर्धार केला की, मला हे करायचेच आहे, की मग तुम्ही पुरुष आहात की स्त्री आहात, यामुळे काहीच फरक पडत नाही.तुम्ही यात प्रगती करू शकता.”
गरिमाच्या जिद्दीचे कौतुक करत शेफ रणवीर ब्रार म्हणाला, “गरिमाने बरेच काही साध्य केले आहे. तिला अशी आक्रमक स्त्रीवादी भूमिका घेता येऊ शकली असती की, महिला देखील हे करू शकतात. पण गरिमा नेहमी हे दाखवण्याचा प्रयत्न करत असते की,हे स्त्रियाही करू शकतात आणि पुरुषही करू शकतात. त्या दोघांना एकसमान संधी मिळायला हव्यात. मला वाटते आपल्या ध्येयावरील फोकस आणि समजूतदारपणा यामुळे तिची यापुढेही उत्तरोत्तर प्रगती होत राहील.”