
no images were found
कोल्हापूर कर्नाटक एसटीच्या ६६० फेऱ्या रद्; ६ हजार ५०० रेणुका भक्तांनी सोडला सुटकेचा निश्वास
कोल्हापूर : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा तापला असताना आता कोल्हापूरवरून सुटणाऱ्या आणि कर्नाटकला जाणाऱ्या एसटी बससेवा बंद करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर स्थानकातून सुटणाऱ्या ६६० गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरच्या ६ हजार ५०० रेणुका भक्तांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दोन दिवसांपूर्वी बेळगावात टोल नाक्यावर कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील ट्रकवर हल्ला केला होता. यावेळी ६ गाड्यांवर दगडफेकदेखील करण्यात आली होती. त्यामुळे एसटी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूरवरून जाणाऱ्या ३३० आणि येणाऱ्या ३३० अशा ६६० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरच्या ६ हजार ५०० रेणुका भक्तांनी सोडला सुटकेचा निश्वास, अडकून पडले होते सौंदत्ती डोंगरावर जिल्हा प्रशासनाची मोठी मदत मिळाली, तसेच भक्तांचेही सहकार्य मिळाले. कोल्हापूर शहरातील अडकून पडलेल्या भक्तांसाठी बेळगाव जिल्हा प्रशासनाची मोठी मदत मिळाली. बुधवारी रात्री ११ पासून गुरुवारी सकाळी ७ पर्यंत सौंदती डोंगर ते कोगनोळी सीमेपर्यंत (महाराष्ट्र हद्दीपर्यंत) पोलीस प्रशासनाने डोंगरावर अडकून पडलेल्या १४४ बसमधील भक्तांना मोठी सुरक्षा प्राप्त करून दिली. यामध्ये प्रत्येकी २० बसेसना डोंगरापासून सीमेपर्यंत खास पोलिस संरक्षण पुरविल्याने कोणत्याही प्रकारची अडचण न येता कोल्हापुरातील भक्तगण सुखरूप पोहोचले.
दरम्यान, कुडाळ आगारातून सुटणारी बेळगाव बसफेरी गुरुवारपासून तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात येणार असून विजापूर बसफेरी मिरजपर्यंतच सोडली जाणार असल्याची माहिती कुडाळ आगार प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यातही उमटल्यानंतर बेळगाव डेपोची बस कुडाळ एसटी आगारात उभी करून ठेवण्यात आली आहे. या आगारात जिल्हा पोलिस प्रशासनाकडून दंगल नियंत्रण पथक तैनात केले आहे. या सीमावादात बेळगावसह कर्नाटकात महाराष्ट्र पासिंगच्या वाहनांवर कन्नड संघटनांकडून हल्ले करण्यात आल्याने, एसटी महामंडळाने बेळगावला जाणाऱ्या एस.टी. बसेस तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.