Home व्यवसाय एस्सेल समूहाची रोमांचक 100 वर्षे पूर्ण

एस्सेल समूहाची रोमांचक 100 वर्षे पूर्ण

18 second read
0
0
6

no images were found

एस्सेल समूहाची रोमांचक 100 वर्षे पूर्ण

 मुंबई, : बहुआयामी भारतीय व्यावसायिक समूह एस्सेल ग्रुपने गौरवशाली 100 वर्षे पूर्ण करून आपल्या प्रवासातील एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. 1926 मध्ये आदमपूर नावाच्या एका छोट्या शहरात झालेल्या सुरुवातीपासून ते विविध व्यवसायांमध्ये विस्तारलेल्या बहुआयामी समूहापर्यंत, एस्सेल ग्रुपने जगभरात एक कायमस्वरूपी ठसा उमटवला आहे.या विशेष प्रसंगी डॉ. सुभाष चंद्र म्हणाले, “एस्सेल ग्रुपचा प्रवास हा चिकाटी, लवचिकता, नावीन्य आणि प्रगतीचा राहिला आहे. व्यावसायिक प्रगती ही  समाजासाठी आणि राष्ट्रासाठी मूल्यवर्धक ठरली पाहिजे, या आमच्या विश्वासानेच ग्रुपने व्यवसायाच्या प्रत्येक क्षेत्रात उचललेल्या महत्त्वपूर्ण पावलांना मार्गदर्शन केले आहे. मला आणि माझ्या बंधूंना 100 वर्षांचा हा महत्त्वपूर्ण टप्पा साजरा करताना अत्यंत अभिमान वाटतो. पिढ्यानपिढ्यांची दूरदृष्टी आणि अज्ञात क्षेत्रात पाऊल ठेवण्याच्या धैर्यातूनच हा टप्पा उभारला गेला आहे, ज्यामुळे जवळपास प्रत्येक उद्योगच खऱ्या अर्थाने शतकपूर्तीचा ठसा उमटवतो आहे. आपल्या राष्ट्रासोबतच एस्सेल ग्रुपचा विकास झाला आहे आणि मला हे सांगताना अभिमान वाटतो की, आपण सर्वांनी मिळून आर्थिक मूल्य निर्माण केले आहे आणि राष्ट्रीय प्रगतीला चालना देण्यासाठी सामाजिक परिवर्तन सक्षम केले आहे.”

      हा महत्त्वपूर्ण टप्पा साजरा करत, डॉ. चंद्रा यांनी आज आयोजित केलेल्या एका विशेष टाऊनहॉलमध्ये एस्सेल ग्रुपच्या जगभरातील 10,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना संबोधित केले. या अत्यंत अनौपचारिक वातावरणात डॉ. चंद्रा यांनी ग्रुपच्या ऐतिहासिक प्रवासावर प्रकाश टाकला आणि हा समृद्ध वारसा पुढे नेण्यात तसेच व्यवसाय भक्कमरित्या उभारण्यात कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या मोलाच्या भूमिकेची दखल घेतली. आपल्या भाषणात, डॉ. चंद्रा यांनी ग्रुपने आपल्या उत्पादनांच्या माध्यमातून जगभरात व्यापक सकारात्मक प्रभाव निर्माण करण्यात दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. अनेक दशकांपासून ग्रुपच्या प्रवासाचा भाग असलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलेल्या हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथाही त्यांनी सांगितल्या. भारतातील पहिली स्टार्टअप कंपनी म्हणून, एस्सेल ग्रुप भविष्यासाठी नवनवीन शोध लावत आणि धाडसी पावले उचलत असल्याचा पुनरुच्चार डॉ. चंद्रा यांनी केला. तसेच, पुढील शतकाचे निर्माते म्हणून उद्योजकतेची भावना जोपासण्याचे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In व्यवसाय
Comments are closed.

Check Also

स्व. आनंदराव पाटील चुयेकर यांच्या सन्मानाच्या गोष्टी विरोधकांनी आम्हाला शिकवू नयेत – धैर्यशील देसाई

स्व. आनंदराव पाटील चुयेकर यांच्या सन्मानाच्या गोष्टी विरोधकांनी आम्हाला शिकवू नयेत –…