no images were found
अदाणी टोटल गैसचे चौथ्या तिमाही आणि आर्थिक वर्ष 2026 चे निकाल
मजबूत पायाभूत सुविधा विस्तार, EBITDA आणि ESG क्षेत्रातील नेतृत्वासह चौथी तिमाही उत्कृष्ट
· आर्थिक वर्ष 26 मध्ये व्हॉल्यूममध्ये 14% वार्षिक वाढ झाली आणि ते 1,133 MMSCM पर्यंत पोहोचले. EBITDA वार्षिक तुलनेत 5% नी वाढून 1,225 कोटी रुपये झाला.
· आर्थिक वर्ष 2026 च्या चौथ्या तिमाही मध्ये व्हॉल्यूम 13% वार्षिक वाढून 297 MMSCM झाला आणि EBITDA INR 310 कोटी झाला.
· सीएनजी नेटवर्क 705 स्टेशन्सपर्यंत वाढले
· पीएनजी कनेक्शन्स सुमारे 11 लाख घरांपर्यंत पोहोचले
· ईव्ही चार्जिंग पॉईंट्सची संख्या 5,100 पर्यंत वाढवण्यात आली
· केअरएज आणि एनएसई कडून सुधारित रेटिंगमुळे ईएसजी नेतृत्व मजबूत झाले
· आर्थिक वर्ष 26 मध्ये 9 नवीन सीजीएस आणि 1 एलसीएनजी प्लांट सुरू करण्यात आले, ज्यामुळे नवीन भागांमध्ये गॅस पुरवठा सुरू झाला
अहमदाबाद, : भारतातील आघाडीची ऊर्जा संक्रमण कंपनी अदाणी टोटल गैस लिमिटेड (एटीजीएल) मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा विकसित करून भारतातील ऊर्जा क्षेत्र बदलण्याच्या आपल्या उद्दिष्टावर पुढे जात आहे. आज एटीजीएल ने 31 मार्च 2026 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाही आणि संपूर्ण आर्थिक वर्षासाठी आपली ऑपरेशनल, इन्फ्रास्ट्रक्चर आणि आर्थिक कामगिरी जाहीर केली.
“ऑपरेशनल उत्कृष्टता आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने मजबूत कामगिरी करत एटीजीएल ने व्हॉल्यूम आणि महसुलात मजबूत दुहेरी अंक वाढ नोंदवली, ज्याला सातत्यपूर्ण EBITDA वाढीचा आधार मिळाला. पश्चिम आशियातील भू-राजकीय अडथळे, एलएनजीच्या वाढलेल्या किमती आणि चलनातील चढ-उतार असूनही, आमच्या वेगवान आणि विविध स्रोतांमधून गॅस खरेदी करण्याच्या धोरणामुळे अखंड गॅस पुरवठा सुनिश्चित झाला. एटीजीएल ने प्रणालीची स्थिरता, आर्थिक शिस्त आणि टप्प्याटप्प्याने विस्तार यावर लक्ष केंद्रित ठेवले असून दीर्घकालीन टिकाऊपणा साध्य केला. यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढला आणि कार्यक्षमतेत सुधारणा झाली. आम्ही सीएनजी, पीएनजी आणि ई-मोबिलिटी क्षेत्रात स्वच्छ ऊर्जा पायाभूत सुविधा वाढवत राहिलो, ज्यामध्ये ईव्ही चार्जिंग पॉइंट्सची संख्या 5,100 पेक्षा जास्त झाली. या काळात सुधारित सस्टेनेबिलिटी रेटिंगमुळे आमची ईएसजी कामगिरी अधिक मजबूत झाली आणि अदाणी टोटल गैस लिमिटेड ने आपल्या सहकाऱ्यांमध्ये ईएसजी क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये स्थान मिळवले.”
“2030 पर्यंत ऊर्जा मिश्रणात नैसर्गिक वायूचा वाटा 15% पर्यंत वाढवण्याच्या भारताच्या उद्दिष्टाला अनुसरून, एटीजीएल देशाला गॅस-आधारित आणि अधिक स्वच्छ ऊर्जेकडे जाण्यास मदत करण्यासाठी चांगल्या स्थितीत आहे.” – सुरेश पी. मंगलानी, सीईओ आणि कार्यकारी संचालक, एटीजीएल