Home सामाजिक अदाणी समूहाच्या नेतृत्वाखालील धारावी सर्वेक्षण अंतिम टप्प्यात – सर्वसमावेशक शहर सुधारनेच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल

अदाणी समूहाच्या नेतृत्वाखालील धारावी सर्वेक्षण अंतिम टप्प्यात – सर्वसमावेशक शहर सुधारनेच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल

0 second read
0
0
55

no images were found

अदाणी समूहाच्या नेतृत्वाखालील धारावी सर्वेक्षण अंतिम टप्प्यात – सर्वसमावेशक शहर सुधारनेच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल

मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी केलेले मोठ्या प्रमाणातील पात्रता सर्वेक्षण १२ ऑगस्टला पूर्ण होत आहे. यामुळे सुमारे १२ लाख रहिवाशांच्या आयुष्यात मोठा बदल घडणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने आणि अदाणी समूहाच्या अंमलबजावणीने सुरू असलेला हा प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठा झोपडपट्टी पुनर्वसन उपक्रम आहे, ज्यात संवेदनशीलता आणि कार्यक्षमतेचं सुंदर मिश्रण पाहायला मिळत आहे.

मुंबईच्या मध्यभागी असलेली धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते. ही एक अशी जागा आहे जिथे लोकांची जिद्द, कल्पकता आणि एकत्र राहण्याची ताकद दिसून येते. कित्येक वर्षांपासून धारावी ही फक्त राहण्यासाठीची जागा नाही, तर लाखो स्थलांतरित कुटुंबांसाठी उपजीविकेचं केंद्र बनली आहे. आता ही धारावी जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असून मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर आहे. कारण धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं मोठं पात्रता आणि घरगुती सर्वेक्षण १२ ऑगस्ट रोजी पूर्ण होणार आहे.

हे सर्वेक्षण केवळ सरकारी प्रक्रिया नाही. मार्च २०२४ मध्ये सुरू झालेल्या या सर्वेक्षणाचा व्याप, संवेदनशीलता आणि वेग पाहता, भारतात शहर पुनर्विकासाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो आहे. महाराष्ट्र सरकारच्या नेतृत्वाखाली आणि अदाणी समूहाच्या अंमलबजावणीत सुरू असलेला हा प्रकल्प केवळ विकासकाम नाही, तर तो माणुसकी, समावेश आणि मोठ्या प्रमाणातील परिवर्तनाचा एक प्रयत्न आहे.

आत्तापर्यंत ८७,००० हून अधिक घरांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे आणि १ लाखांहून अधिक घरे नकाशावर दाखवली गेली आहेत. हे फक्त आकडे नाहीत, तर भविष्यातील घर, रोजगार आणि सुरक्षिततेसाठीची पायाभरणी आहे. जे रहिवासी १ जानेवारी २००० किंवा त्याआधी धारावीत राहायला आले आहेत, त्यांना नव्या पुनर्विकसित धारावीत ३५० चौरस फूटचे मोफत घर मिळणार आहे. जे लोक २००० ते २०११ दरम्यान आले आहेत, विशेषतः ग्राउंड फ्लोअरवर राहणारे, त्यांना जवळच्याच परिसरात ३०० चौरस फूटचे घर फक्त २.५ लाख रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ही योजना म्हणजे सर्वसामान्यांसाठी परवडणारी आणि न्याय्य अशी प्रगतीची वाट आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…