Home मनोरंजन पहिल्यांदाच जुळ्या बहिणी सुरभी आणि समृद्धी मेहरा झी टीव्हीच्या आगामी शो ‘छोरियाँ चली गाँव’मध्ये वेगळ्या रूपात सहभागी होणार!

पहिल्यांदाच जुळ्या बहिणी सुरभी आणि समृद्धी मेहरा झी टीव्हीच्या आगामी शो ‘छोरियाँ चली गाँव’मध्ये वेगळ्या रूपात सहभागी होणार!

3 second read
0
0
52

no images were found

पहिल्यांदाच जुळ्या बहिणी सुरभी आणि समृद्धी मेहरा झी टीव्हीच्या आगामी शो ‘छोरियाँ चली गाँव’मध्ये वेगळ्या रूपात सहभागी होणार!

भारतीय संस्कृतीचं वैभव आणि भावनिक खोली यांचं प्रतिबिंब असणाऱ्या हटके नॉन-फिक्शन फॉरमॅट्स सादर करण्याच्या आपल्या परंपरेला पुढे नेत, झी टीव्ही एक अनोखा रिअॅलिटी शो – ‘छोरियाँ चली गाँव’ सादर करण्यासाठी सज्ज आहे. हा शो ‘इंडिया’ आणि ‘भारत’ यांच्यातील दरी कमी करतो, कारण यात 11 स्वतंत्र महिला एकत्र येणार आहेत, ज्या त्यांच्या शहरी जीवनातील धावपळ, वेगवान गती आणि आलिशान सुविधा मागे ठेवून 60 दिवसांपेक्षा अधिक काळ भारताच्या एका गावात राहणार आहेत. त्यांच्याकडे कोणतेही गॅजेट्स, सुविधा किंवा शॉर्टकट्स नसतील. त्या गावातील काम करतील, हळूहळू पण मुळापासून असलेल्या जीवनशैलीशी जुळवून घेतील आणि ग्रामीण जीवनशैलीत पूर्णपणे समरस होतील. या प्रवासात तीन मजबूत कथानकांचे स्तंभ आहेत – ग्रामीण जीवनात टिकून राहणे व जुळवून घेणे, सांस्कृतिक व भावनिक समरसतेत सहभागी होणे, शिवाय स्पर्धा व सामाजिक रणनीति या अंगांनी समृद्ध असा हा शो सामाजिकदृष्ट्या अर्थपूर्ण तर असेलच, पण भावनिकदृष्ट्याही प्रेक्षकांना जोडून ठेवेल.

या परिवर्तनाच्या प्रवासात रणविजय सिंग आपली शांत, समजूतदार आणि खास शैली घेऊन आला आहे, जो या शोचा होस्ट, मार्गदर्शक आणि स्थिर प्रेरणास्त्रोत म्हणून दिसेल. या शोमध्ये तरतरीत आणि तरुण ऊर्जा देण्यासाठी, लोकप्रिय कंटेंट क्रिएटर्स आणि जुळ्या बहिणी – सुरभी आणि समृद्धी मेहरा, म्हणजेच आपल्या सगळ्यांना चिंकी-मिंकी म्हणून ओळख असलेल्याही सहभागी होणार आहेत. अलीकडे, त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली होती – “भारी मनाने आम्ही आता एक जोडी म्हणून वेगळ्या होत आहोत. आम्ही आमच्या वैयक्तिक प्रवासात जीवनाचा शोध घेण्याचा निर्णय घेतला आहे.”

या पोस्टमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि मीडियामध्ये खूपच चर्चा आणि कुतूहल निर्माण झाले.

थोड्याच दिवसांत, त्यांनी उघड केले की त्या दोघी झी टीव्हीच्या आगामी रिअॅलिटी शो ‘छोरियाँ चली गाँव’ मध्ये भाग घेत आहेत – आणि यावेळी त्या जोडी म्हणून नव्हे, तर पहिल्यांदाच स्वतंत्र स्पर्धक म्हणून दिसणार आहेत.

सुरभी मेहरा म्हणाली, “मी सततच्या व्यस्त वेळापत्रकात आणि शहरी जीवनातील गडबडीत नेहमी एक वेगवान आयुष्य जगले आहे. माझे आयुष्य वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये शूटिंगमध्येच हरवलंय आणि त्याच्याशी सतत जोडलेले राहिले आहे. त्यामुळे ‘छोरियाँ चली गाँव’ जेव्हा माझ्यासमोर आला, तेव्हा मी खूपच उत्साहित झाले पण थोडीशी घाबरलेही होते. गॅजेट्स, वाय-फाय, आणि शहरातील धावपळ नसेल अशा गावात राहणे हीच एक मोठी गोष्ट आहे, पण हाच भाग मला खूप आकर्षित करतो. माझ्या जुळ्या बहिणीसोबत हे अनुभवणे अजूनच खास आहे – आम्ही नेहमीच एकमेकींना पाठिंबा दिला आहे, पण हा अनुभव आम्हाला एक नवीन आव्हान आणि शिकवण देईल. मी या शोकडे एक ब्रेक म्हणून पाहते – ज्यामध्ये स्वत:कडे पाहता येईल, नात्यांशी पुन्हा जोडता येईल आणि खरंच वास्तव जगता येईल.”

समृद्धी मेहरा म्हणते, “आपण बर्‍याच वेळा म्हणतो की आपल्याला आपल्या सोयीच्या चौकटीतून बाहेर यायला हवं – पण ‘छोरियाँ चली गाँव’ मला ती गोष्ट प्रत्यक्षात अनुभवायला मिळवून देणार आहे. मी अशा जगात मोठी झाले जिथे सगळं खूप वेगात चालतं, स्क्रीनवर आधारित आहे आणि अपेक्षांनी भरलेलं आहे. हा शो फक्त एक नवीन सेटिंग नाही – ही पूर्ण मानसिकतेतील एक बदल घडवणारी गोष्ट आहे. तो थांबायला भाग पाडतो, स्वतःकडे पाहायला भाग पाडतो, आणि प्रत्येक परिस्थितीला नव्यानं सामोरे जायला शिकवतो. मला माहित आहे की हा प्रवास सोपा नसेल – पण मी इथे सोयीसाठी आलेली नाही, मी इथे स्वतःला उलगडण्यासाठी आले आहे. माझी जुळी बहिण सोबत असणे याचा अर्थ असा की आम्ही आमच्यातील नव्या बाजू एकत्र शोधू शकतो. मला अनपेक्षित क्षण, साधी दिनचर्या आणि या प्रवासातून मिळणारी शिकवण यांची खूप उत्सुकता आहे. मी हा अनुभव घेण्यासाठी खरोखरच आतुर आहे.”

‘छोरियाँ चली गाँव’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो असेल उत्साहाने भरलेला, हृदयाला भिडणारा आणि मानवी प्रवासाची झलक दाखवणारा – कारण यात 11 नामांकित महिला ग्रामीण जीवनशैलीला आत्मसात करणार आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…