
no images were found
पुणे, (प्रतिनिधी):-शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी,धनगर समाजाचे आरक्षण तत्काळ लागू करीत समाजातील बेरोजगार तरुणांना नोकरीत १३% आरक्षण द्यावे यासह विविध मागण्यासाठी उपोषणावर बसलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपोषणाला इंडिया अगेन्स्ट करप्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी समर्थन दिले आहे.
शेतकरी तसेच ओबीसी बांधवांसाठी लढणारे बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर विश्वास ठेवत उपोषण मागे घ्यावे. फडणवीस यांनी कर्जमाफी तसेच इतर मागण्यांवर चर्चेसाठी समिती तयार करण्याचे आश्वासन दिले आहेत.बच्चू कडू यांनी आता प्रकृतीची काळजी घेऊन असंख्य कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत उपोषण मागे घेत सरकार सोबत चर्चा करावी,असे आवाहन पाटील यांनी केले.शासकीय नोकरीत ओबीसी बांधवांना २७ टक्के आरक्षण देण्याची मागणी
मागासवर्गीयां ना विकासाच्या मुख्यप्रवाहात आणणारी ठरेल, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांसाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करून १० लाखांची मदत करावी,शेतकऱ्यांना खत,बियाणे विनाशुल्क देण्यात यावे, शेतमाल विमा योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यात देत हप्त्याचे ५०% पेक्षा जास्त शुल्क शासनाने द्यावे, शेतीसाठीचे वीज बील माफ करीत अखंड वीज पुरवठा करावा, शासकीय खरेदी केंद्रावर शेतमाल हमी भावावर खरेदी करावा,शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना लागू करीत त्यांना उच्च शिक्षण द्यावे, अशा मागण्या बच्चू कडू यांच्या आहेत.या न्याय मागण्यावर सरकार सकारात्मक विचार करेल,असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
राज्यातील दिव्यांगासाठी बच्चू कडू सुरवातीपासूनच संघर्ष करत आले आहेत. दिव्यांग आणि विधवा महिलांना ६ हजार रुपये मानधन देण्याची मागणी देखील कडू यांनी केली आहे. सरकार ने या मागणीचा देखील सकारात्मक विचार करीत राज्यातील असंख्य दिव्यांग आणि विधवा भगिनींना न्याय द्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.