
no images were found
नरवीर बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या बलिदानाचा अपमान करणारा उरूस भरल्यास उधळून लावणार; हिंदू एकता आंदोलनाची संतप्त निदर्शने
कोल्हापूर (प्रतिनिधी):-“विशाळगडावर मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार याच्या नावाने भरणाऱ्या बेकायदेशीर ऊरसावर कायमस्वरूपी बंदी घाला, मुस्लिम सरदार मलिक ए रेहानच्या नावाने उभारलेला बेकायदेशीर दर्गा उध्वस्त करा, विशाळगडावरील न्यायालयाने स्थगिती दिलेली बांधकामे चांगल्या वकिलाची नेमणूक करून त्यावरील स्थगिती उठवून ती बेकायदेशीर बांधकामे ताबडतोब उध्वस्त करा” आदी मागण्यांसाठी हिंदू एकता आंदोलनाच्यावतीने हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे संतप्त निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली व शिवभक्तांनी संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून सोडला.
यावेळी बोलताना माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, हिंदू एकता आंदोलनाने केलेल्या मागणीनुसार सरकारने विशाळगडावर बोकड व कोंबड्यांच्या कत्तलीला बंदी, मास शिजवायला बंदी व दारू प्राशन करायला बंदी घातली असताना न्यायालय विशाळगडावर उरूस साजरी करायला व बकऱ्यांच्या कत्तलीला परवानगी देतीच कशी? कोल्हापूर प्रशासन न्यायालयात बाजू मांडण्यास अपयशी ठरलेला आहे. ताबडतोब वरच्या कोर्टात जाऊन दिलेल्या परवानगीस प्रशासनाने स्थगिती आणावी. नरवीर बाजीप्रभू देशपांडे व फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाचा अपमान करणारा विशाळगडावर उरुस भरवायचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्रातील शिवभक्त उधळून लावतील व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कोल्हापूर जिल्हा प्रशासन त्यास जबाबदार राहील.
कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा दंडाधिकार्याची पावर वापरून उरूस भरून देऊ नये. प्रतापगडाच्या पायथ्याशी मुस्लिम सरदार अफजलखानाच्या नावानं भरणाऱ्या उरुसावर आम्ही मागणी केल्यानंतर सातारा जिल्हा प्रशासनाने कायमस्वरूपी बंदी घातली. त्याच धर्तीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने विशाळगडावर मलिक ए रेहानच्या नावावर भरणाऱ्या उरुसावर कायमस्वरूपी बंदी घालावी.
यावेळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष दीपक देसाई, सांगली शहर जिल्हाअध्यक्ष संजय जाधव, संजय तांदळे, नारायण वेल्हाळ, दत्ता भोकरे, राजू जाधव, सोमनाथ गोटखिंडे, प्रसाद रिसवडे, अनिरुद्ध कुंभार, रवींद्र वादवणे, प्रदीप निकम, मनोज साळुंखे, गजानन मोरे, अवधूत जाधव, कृष्णा नायडू, गजानन माने, अरविंद यतनाळे, यश पाटील, प्रेम देसाई, श्रीधर मेस्त्री, सुमित शिंगे, सुजित राजोबा आदींसह हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.