
no images were found
नेहा जोशी १०० वर्ष जुन्या बेंचवर बसल्यानंतर भावूक झाल्या, ज्यावर अटल बिहारी वाजपेयी बसायचे
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘अटल’मध्ये कृष्णा देवी वाजपेयीची भूमिका साकारणाऱ्या प्रतिभावान अभिनेत्री नेहा जोशी या मालिकेचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यासाठी नुकतेच ग्वाल्हेरला गेल्या होत्या. ही फक्त ट्रिप नव्हती तर इतिहासाची माहिती देणारी, महान नेता स्वर्गीय श्री. अटल बिहारी वाजपेयी यांना मानवंदना देणारी भेट ठरली, त्यांचा वारसा आजही लाखो व्यक्तींना प्रेरित करत आहे. नेहा यांच्यासाठी हा प्रवास त्यांच्या भूमिकेच्या सेलिब्रेशनपेक्षा अधिक ठरला आणि त्यांना वैयक्तिक अनुभव मिळाला. अटलजींचा जन्म झालेल्या शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये फेरफटका मारण्याचा निर्धार करत त्यांनी या असाधारण व्यक्तीमत्त्वाच्या जीवनाला आकार दिलेले स्थळ व गाथांचा अनुभव घेतला. त्यांच्या भेटीचे खास आकर्षण ठरलेल्या क्षणाने त्यांना भवूक केले, तो क्षण म्हणजे त्या शंभर वर्षे जुन्या बेंचवर बसल्या, ज्यावर अटलजी बसून त्यांचे आवडते स्नॅक मंगोदाचा (पकोडे) आस्वाद घ्यायचे. हा बेंच फक्त स्थान नव्हते तर अटलजी या बेंचवर बसून अनेक स्वादिष्ट मिष्टान्नाचा आस्वाद घ्यायचे. नेहा यांना त्या काळात गेल्यासारखे वाटले, मालिकेमध्ये त्या साकारत असलेल्या या महान नेत्याच्या आईच्या भावनांशी संलग्न झाल्या. नेहा जोशी ऊर्फ कृष्णा देवी वाजपेयी म्हणाल्या, ”या ऐतिहासिक बेंचवर बसून त्यांच्या आवडत्या पकोड्यांचा आस्वाद घेताना मी भारावून गेले. तो फक्त आहार नव्हता तर जुन्या काळाची आठवण करून देणारा क्षण ठरला. या बेंचमध्ये त्यांच्या विनम्र शुभारंभांची गाथा सामावलेली आहे, ज्यामधून अटलजींच्या जीवनातील साधेपणा व सखोलता दिसून येते. तो क्षण भावूक, तसेच परिवर्तनात्मक ठरला.”
या भेटीदरम्यान त्या एका दुकानदाराला देखील भेटल्या, जो अटलजींना त्यांच्या पंतप्रधान असण्याच्या काळामध्ये त्यांचे आवडते स्नॅक द्यायचा. अनेक वर्षे उलटली तरी या दुकानामध्ये काहीच बदल झालेले नाही आणि आजही कार्यरत आहे. नेहा म्हणाल्या, ”दुकानाच्या मालकाने प्रथम देवाला आणि त्यानंतर अटलजींच्या फोटोच्या बाजूला असलेल्या त्यांच्या आईच्या फोटोला पकोडे वाहिले. आदर व कृतज्ञतेमध्ये सामावलेली ही परंपरा होती आणि मला त्या दिवसामधील पहिला ग्राहक असण्याचा अभिमान वाटला. तो गेस्चर साधा, पण सर्वोत्तम होता, ज्यामधून त्या युगाची कालातीत मोहकता दिसून आली.” नेहा यांनी इतिहासाला उजाळा देण्यासोबत त्यामध्ये सामावून देखील गेल्या. त्या म्हणाल्या, ”अभिनेत्री म्हणून मी भूमिकांसंदर्भात संशोधन करते आणि भूमिका साकारते, पण या ट्रिपदरम्यान मी त्यांचा प्रवास जगले. ग्वाल्हेरच्या रस्त्यांमधून चालताना, त्यांच्या आवडत्या स्थळांना भेट देत आणि त्यांच्याबाबत कथा ऐकताना मला या महान नेत्यामागील माणूस समजला. या अनुभवाने माझ्या मनावर अमिट छाप पाडली आहे आणि मला माझ्या भूमिकेमध्ये वास्तविकता आणण्यास मदत केली आहे.”