Home शैक्षणिक भरड धान्यांचा उपयोग दैनंदिन आहारामध्ये होणे आवश्यक – कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के

भरड धान्यांचा उपयोग दैनंदिन आहारामध्ये होणे आवश्यक – कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के

4 second read
0
0
28

no images were found

भरड धान्यांचा उपयोग दैनंदिन आहारामध्ये होणे आवश्यक – कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के

कोल्हापूर( प्रतिनिधी)  – भरड धान्यांचा उपयोग दैनंदिन आहारामध्ये होणे आवश्यक, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांनी केले. विद्यापीठाच्या व्यवस्थापन सभागृहामध्ये आयोजित ऑनलाईन बैठकीमध्ये 'मिलेट द नेचर्स क्रॉप' या पुस्तकाच्या अनावरण प्रसंगी कुलगुरू डॉ.शिर्के बोलत होते. या पुस्तकासाठी बहिस्थ परिक्षक म्हणून परिक्षण केलेले इंडिया मिलेट इनिशिएटीव्हचे चेअरमन डॉ.सत्येन यादव हे ऑनलाईन उपस्थित होते. अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान अधिविभागातील डॉ.अभिजीत अरुण गाताडे, डॉ.प्रविणकुमार पाटील, श्री.हर्षवर्धन कांबळे यांनी या पुस्तकाचे संकलन केले आहे. कुलगुरू डॉ.शिर्के यांच्या हस्ते हे पुस्तक ई-बुक फॉर्ममध्ये विद्यापीठाच्या वेबसाईटवर सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आले. इंग्रजी भाषेमध्ये असलेले हे पुस्तक मराठी भाषेमध्ये उपलब्ध करून देण्याबाबतही डॉ.शिर्के यांनी संबंधीतांना सूचना केली.
कुलगुरू डॉ.शिर्के पुढे म्हणाले, भरड धान्य पिकांची वैशिष्टये म्हणजे ही अल्प पावसाच्या परिस्थितीत शुष्क आणि अर्ध-शुष्क भागात वाढतात. या पिकांमध्ये उच्च पौष्टिक मूल्ये असून ती पौष्टिक तृणधान्य म्हणून ओळखली जातात. यापासून विविध आरोग्यवर्धक पदार्थ तयार करता येतात. कोल्हापूर हॉटेल संघटनांनीही भरड धान्याचा समावेश मेनू कार्डमध्ये करण्याचा मानस व्यक्त केला आहे. ई-बुक स्वरूपातीले हे पुस्तक सर्वांना उपयोगी ठरणार आहे. येत्या काळात भरडधान्यांवर नवनवीन संशोधनपर
उपक्रम हाती घेवून, तसेच भरडधान्यांवर आधारित असणारे पारंपारिक खाद्यपदार्थांबांबत माहितीचे संकलन करुन भरडधान्यांना भारतात तसेच परदेशातही प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. हे पुस्तक भरडधान्यांबाबत एक शाश्वत माहिती प्रदान करणारे जेणेकरून भरडधान्यांचे उत्पादन व वापर वाढीस चालना मिळेल, यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे.
याप्रसंगी, इंडिया मिलेट इनिशिएटीव्हचे चेअरमन डॉ.सत्येन यादव आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक डॉ.अभिजीत गाताडे यांनी केले तर अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान अधिविभागाचे प्रमुख डॉ.प्रविणकुमार पाटील यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास शिंदे, हर्षवर्धन कांबळे उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…