
no images were found
८५ वर्षावरील मतदार व दिव्यांग मतदारांना घरातून मतदान करण्याची सुविधा मिळणार
कोल्हापूर : ४७- कोल्हापूर लोकसभा मतदार संघ अंतर्गत २७६ कोल्हापूर (उत्तर) विधानसभा मतदार संघामध्ये एकूण ३११ मतदान केंद्रे आहेत. या मतदार संघात पुरुष मतदार १ लाख ४४ हजार १०९, स्त्री मतदार १ लाख ४६ हजार ८८ व तृतीयपंथी १७ असे एकूण २ लाख ९० हजार २१४ इतके मतदार आहेत. सैनिक मतदार ९५ आहेत. २७६ कोल्हापूर (उत्तर) विधानसभा मतदार संघात वय वर्षे ८५ वरील मतदार ५१३० आहेत व दिव्यांग मतदार ५१९ आहेत त्यांच्यासाठी घरातून मतदान (Home Voting)
बजावण्यासाठी निवडणूक आयोगाकडून नमुना नंबर १२डी चे फॉर्म ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असून असून, सदर फॉर्मचे वाटप संबंधित मतदारांना करण्यात येत असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) तथा २७६ कोल्हापूर (उत्तर) विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक अधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी दिली.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची आचारसंहिता लागू करण्यात आली असून २७६ कोल्हापूर (उत्तर) विधानसभा मतदार संघाअंतर्गत विविध शासकीय अधिकारी तसेच राजकीय पक्ष प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
३११ मतदान केंद्रापैकी १५६ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. मतदान केंद्र क्रमांक १०८ (माईसाहेब बावडेकर बालमंदीर सिनिअर केजी ३ री चा वर्ग) येथे गुलाबी मतदान केंद्र करण्यात येणार असून तेथे निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त मतदान पथकातील सर्व सदस्य महिला अधिकारी आहे, केंद्र क्रमांक १०६ (न्यु मॉडेल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज) येथे निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त मतदान पथकातील सर्व सदस्य दिव्यांग अधिकारी आहेत व केंद्र क्रमांक १४६ (देशभक्त रत्नाप्पान्ना कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स आणि आटर्स कॉलेज) येथे निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त मतदान पथकातील सर्व सदस्य युवक अधिकारी नियुक्त केलेले आहेत.
२७६ कोल्हापूर (उत्तर) विधनसभा मतदार संघासाठी ४१ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक करतण्यात आलेली आहे. तसेच आचारसंहिता अंमलबजावणीकरिता ६ स्थिर निरीक्षण पथकांची, १२ भरारी पथकांची, ४ व्हिडीओ सर्वेक्षण पथकांची व व्हिडीओ पडताळणी साठी ४ पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच आचारसंहितेमध्ये मतदार संघातर्गत विविध परवाणगी देणेची कार्यवाही एक खिडकी मार्फत करण्यात येणार आहे. तसेच सदर बैठकीत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे सर्व राजकीय पक्षांनी करावे, असे आवाहन खिलारे यांनी केले.